अभाविपतर्फे महाविद्यालय खोलो आंदोलन
प्रतिनिधी / सांगली
आज महाविद्यालय बंद होऊन १० महिने उलटून गेली तरीही महाविद्यालय सुरू झालेली नाहीत, सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी घरात बसून आहेत, हे सरकार त्यांच्या भावनांशी खेळत आहे. आजची परिस्थिती पाहता कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला आहे. मात्र महाविद्यालयेच बंद का म्हणून लवकरचं महाविद्यालय सुरू व्हावीत यासाठी आज, संपूर्ण महाराष्ट्रात अभाविपचे महाविद्यालय खोलो हे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आला. सांगली येथील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाच्या समोर देखील अभाविपच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
येत्या काळात जर महाविद्यालय चालू झाले नाहीत, तर शिक्षण मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असे मत या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रतीक पाटील यांनी मांडले. महाविद्यालय बंद असल्यामुळे जे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्षाच नुकसान झालंय याला सरकार जबाबदार आहे. असे मत माधुरी लड्डा यांनी वक्त केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मागण्यांचे निवेदनही प्राचार्यांना देण्यात आले. यावेळी शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं,शिक्षण मंत्री एक काम करो खुर्ची छोडो आराम करो, शिक्षण मंत्र्यांचं करायचं काय, आशा घोषणाबाजी ने महाविद्यालय परिसर दुमदुमुन गेला.
संपूर्ण राज्यामध्ये नाही तर देशामध्ये कोरोनामुळे गेल्या मार्च २०२० पासून सर्व महाविद्यालय बंद आहेत. पण हळू हळू परिस्थिती पूर्ववत होत आहे. राज्यसरकार ने बिअर-बार, हॉटेल, मंदिरे, व्यायामशाळा हे सर्व एकीकडे सुरू केले आहे, मग महाविद्यालये च बंद का म्हणून हे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.