महसूल, पोलीस अधिकारी, कर्मचाऱयांना देणार लस : जिल्हय़ात आता दहा ठिकाणी केंदे
पहिल्या टप्प्यात आतापर्यंत 2873 जणांनी घेतली लस
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोना लसीकरणाच्या दुसऱया टप्प्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हय़ात 8,500 लस उपलब्ध झाली आहे. या दुसऱया टप्प्यात महसूल व पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांना लस दिली जाणार आहे. लवकरच दुसरा टप्पा सुरू होणार आहे. लसीकरण केंदेही वाढविण्यात आली असून आता दहा केंद्रांवर लस दिली जाणार आहे. दरम्यान पहिल्या टप्प्यात आतापर्यंत 2873 जणांनी लस घेतली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट कोसळल्यानंतर वर्षभरानंतर भारतात कोरोनावर लसीचे संशोधन होऊन 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सिंधुदुर्ग जिल्हय़ात 10 हजार 500 लस उपलब्ध होऊन जिल्हा रुग्णालयासह कणकवली व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय या तीन ठिकाणी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. या पहिल्या टप्प्यात आरोग्य अधिकारी व कर्मचाऱयांना लस देण्यात येत आहे. आतापर्यंत 2738 जणांना लस दिली आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालय 439, कणकवली उपजिल्हा रुग्णालय 788, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय 829, शिरोडा उपजिल्हा रुग्णालय 258, मालवण ग्रामीण रुग्णालय 301, वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय 258 या प्रमाणे सहा ठिकाणी लसीकरण केंदे सुरू करीत 2873 जणांना आतापर्यंत लस दिली गेली आहे.
आणखी चार लसीकरण केंदे वाढवली
लसीकरणाला सुरुवात झाली तेव्हा फक्त तीन लसीकरण केंदे होती. त्यात वाढ होऊन सहा केंदे करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा आणखी चार केंदे वाढविण्यात आली आहेत. देवगड, वैभववाडी, दोडामार्ग आणि कुडाळ ग्रामीण रुग्णालयातही लसीकरण केंदे सोमवारपासून सुरू करण्यात येत आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लसीकरण केंदे वाढवून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरापर्यंत लसीकरण केंदे सुरू केली जाणार आहेत.
दुसऱया टप्प्यासाठी 8500 लस उपलब्ध
कोरोना लसीकरणाच्या दुसऱया टप्प्यासाठी जिल्हय़ाला 8,500 लस उपलब्ध झाली आहे या दुसऱया टप्प्यात महसूल अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना लस दिली जाणार आहे. लस देणाऱया कर्मचाऱयांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे.
दरम्यान पहिल्या टप्प्यातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱयांना लस देणे सुरूच असून काहीजणांनी लसीकरणाच्या यादीत नाव असूनही लस घेतली नाही. अशा लोकांना लस घेण्यासाठी तीनवेळा संधी दिली जाईल. त्यानंतर यादीतून त्यांचे नाव काढले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.