वार्ताहर / किणे
सिरसंगी येथील म्हारकी शेतातील सुमारे ४० एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. भर दुपारी१२ वाजता लागलेल्या आगीत संपूर्ण ऊस खाक झाल्याने सुमारे ५०० टन ऊसाचे नुकसान झाले. यामध्ये ४३ शेतकऱ्यांचे ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. या मध्ये आनंदा कांबळे व संतोष कांबळे यांच्या ४० पाईप जळून खाक झाल्या आहेत.
उपसरपंच वसंत सुतार अप्पासाहेब देसाई सी आर देसाई तलाठी परीट पोलीस पाटील दत्तात्रय गुरव वीज वितरण खात्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीला वीज खातेच जबाबदार असून वीज वितरण खात्याने संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.