रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिह्यामध्येदेखील पुन्हा कोरोना निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राजकीय पक्षांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी यांनी आपल्या सामाजिक जीवनात कोरोना निर्बंधांचे पालन करत असल्याचे उदाहरण लोकांसमोर ठेवले पाहिजे.
कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने लवकरच या साथीतून आपण बाहेर पडू असे वाटत असताना पुन्हा एकदा दैनिक रुग्ण संख्येने वाढती श्रेणी दर्शविली आहे. यामुळे कोकणातील आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली आहे. राज्य सरकारने देखील लोकांना निर्बंध पाळण्याचा इशारा दिला आहे.
रत्नागिरी जिह्यात खेड, चिपळूण व दापोली या तालुक्मयात कोरोना वाढीचा वेग अधिक असल्याची आकडेवारी दिसत आहे. या तीन तालुक्मयात तातडीने मोबाईल टेस्टींग व्हॅन युनिट सुरू करावे. ग्राम कृती दल व नागरी कृती दल यांनी पुन्हा कार्यान्वित करावे. जिल्हय़ात बाहेरून येणाऱयांवर नजर ठेवावी. बाह्य रुग्णांचे प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी चाचण्याची संख्या वाढवावी आदी सूचना जिल्हाधिकाऱयांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. रत्नागिरी जिह्यात रात्रीच्या वेळी संचारबंदी करण्याचा विचार जिल्हा प्रशासनाने चालवला आहे.
खेड तालुक्मयात वरवली या एकाच गावी 27 रुग्ण एकदम सापडल्याने आरोग्य यंत्रणा जोरदारपणे कामास लागली. कोरोना नियंत्रणात येत असताना एवढे रुग्ण एकाच गावी कसे काय सापडले असा प्रश्न निर्माण झाला. लागण झालेल्या सुरुवातीच्या लोकांनी दुर्लक्ष केले त्यामुळे त्याचा प्रसार झाला आणि त्यानंतर जेव्हा चाचणी झाली तेव्हा हे रुग्ण सापडले. त्या पाठोपाठ जिह्यात विविध ठिकाणी रुग्ण संख्येचा आलेख वाढत गेला. डिसेंबरनंतर वाढीचा वेग इतक्मया प्रमाणात प्रथमच आढळत आहे. रत्नागिरी जिह्यात रुग्णांची संख्या 9,870 वर पोचली. सिंधुदुर्ग जिह्यात रुग्णसंख्येने 6 हजारचा टप्पा ओलांडला आहे. 173 जण मृत्यूमुखी पडले तर क्रियाशील रुग्णसंख्या पावणे दोनशेपर्यंत पोहोचली. सिंधुदुर्ग जिह्यात कणकवली तालुक्मयात सर्वाधिक रुग्ण आहेत. वैभववाडी, दोडामार्गसारखे लोकसंख्येने कमी असलेले तालुके कोरोना नोंदीतही मागे आहेत.
दापोली, चिपळूण, रत्नागिरीसह नागरी क्षेत्रामध्ये विनामास्क फिरणाऱया लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यातून हजारो रुपयांचा दंड नगर परिषदेच्या तिजोरीत जमा होत आहे. सर्व तालुक्मयांमध्ये तहसील कार्यालय, एसटी डेपो, पंचायत समिती परिसर, बँकांमध्ये गर्दी झालेली दिसून येते. या ठिकाणी कोणतीही बंधने पाळली जात नाहीत. यामुळे कोरोना रुग्णाचा सामूहिक संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ठिकठिकाणी भरणाऱया आठवडा बाजारात तर मोठी गर्दी होते. त्याठिकाणी सामाजिक अंतर, मास्क व हात धुण्याचे नियम खरे तर पाळले पाहिजेत परंतु आठवडा बाजार नेहमीच्या तंत्राने सुरू असल्याचे दुर्दैवाने दिसत आहे. शेकडो कि. मी. वरून प्रवास करून येणारे भाजी व्यापारी आणि त्यांच्या संपर्कात येणारे स्थानिक ग्राहक हे कोरोनाच्या जोखीम टप्प्यात येणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
अलीकडे राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांप्रमाणे लग्न सोहळे, धार्मिक, सामाजिक कार्यकम, क्रीडा स्पर्धा घेताना पोलिसांचा ना हरकत दाखला मिळवून त्यानंतर प्रांताधिकाऱयांची परवानगी घेण्याची अट आणली जात आहे. लग्न कार्याचे महिने म्हणून माघ फाल्गुन हे मानण्यात येतात. अनेकांनी मार्च महिन्यात या सोहळय़ांसाठी मुहूर्त काढला आहे. त्यासाठी सभागृह ठरले असून जेवणाच्या ऑर्डरही देण्यात आल्या आहेत. मध्यंतरी आपण कोरोनातून बाहेर पडत आहोत असे चित्र निर्माण झाल्याने अनेकांनी या सोहळय़ांना भव्यदिव्य स्वरूप देण्याचे नियोजन केले आहे. मात्र आता याच सोहळय़ांसाठी प्रांताधिकाऱयांची परवानगी घ्यावी लागणार असल्याने साहजिकच 50 व्यक्तीच या सोहळय़ाला उपस्थित राहू शकतील अशी शक्मयता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी मंगलकार्य आयोजकांना नव्या निर्बंधाप्रमाणे कार्यकम रद्द करावे लागले आहेत. काही मंगल कार्यालय व्यवस्थापकांनी स्वीकारलेली आगाऊ रक्कम सोहळा रद्द झाल्यामुळे परत करणे अपेक्षित होते परंतु हे पैसे परत मिळू शकले नाहीत, अशा तक्रारी काही ठिकाणाहून आल्या आहेत.
कोकणात खेडोपाडी अंडरआर्म व ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धांचे पेव फुटले आहे. यातील ओव्हरआर्म स्पर्धा दिवसा तर अंडरआर्म स्पर्धा रात्रीच्यावेळी खेळवल्या जातात. या स्पर्धांवेळी शेकडोंची उपस्थिती असते. तसेच यावेळी कोणतेही नियम पाळले जात नाहीत. अशा स्पर्धांसाठी प्रांताधिकाऱयांची परवानगी घेणेही अवघड आहे त्यामुळे रात्री खेळवल्या जाणाऱया स्पर्धांवर प्रशासन लक्ष ठेवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोना लसीकरणाला आरोग्य कर्मचाऱयांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. तथापि, पोलिसांचा प्रतिसाद मात्र चांगल्या प्रकारे मिळत आहे. त्यापाठोपाठ प्रशासनातील लोकही लस घेत आहेत याशिवाय इतर स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱयांनाही लस देण्याचे काम सुरू आहे. मार्चमध्ये 50 वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. मात्र याबाबत अद्यापही सूचना येणे बाकी असल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे.
कोरोनाविषयी जाणीव जागृती अभियान सुरुवातीच्या टप्प्यापासून राबवण्यात येत आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर बंधनमुक्तीची भावना सगळीकडे पसरली. त्यातून प्रवास करणारे लोक असोत अथवा बाजारपेठेत खरेदी करणारे असोत त्या सर्वांनी अधिक मोकळीक घेऊन व बंधने बाजूला ठेवून व्यवहार करणे सुरू केले. खरेतर हे करणे म्हणजे थोडी घाई होती. तथापि साथीच्या पुन्हा वाढत्या बंधनांची आवश्यकता निर्माण झाली आहे.
रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिह्यामध्येदेखील पुन्हा कोरोना निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राजकीय पक्षांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी यांनी आपल्या सामाजिक जीवनात कोरोना निर्बंधांचे पालन करत असल्याचे उदाहरण लोकांसमोर ठेवले पाहिजे. एका बाजूला मुख्यमंत्री नियम पालनाचा आग्रह धरतात तर त्यांच्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी अथवा सरकारी अधिकारी हे त्याचे तेवढय़ाच आग्रहपूर्वक पालन करतात, असे चित्र दिसल्यास कोरोनामुक्तीचे पाऊल निश्चितपणे पुढे पडेल.
सुकांत चक्रदेव