प्रतिनिधी / संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील नायरी खोऱ्याला जोडणाऱ्या शास्त्रीपूल ते तांबेडी रस्त्याचे डाम्बरीकरण त्वरित हाती घेण्यात यावे यासाठी शास्त्रीपुल ते तांबेडी गावातील ग्रामस्थ शास्त्रीपुल येथे आंदोलनाला बसले आहेत.
तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा पर्यायी जोडरस्ता म्हणुन शास्त्रीपुल, फणसवणे, तांबेडी तुरळ मार्ग ओळखला जातो. मात्र गेली कीत्येक वर्ष हा रस्ता दुर्लक्षीत असुन शास्त्री पुल ते कसबा या भागात प्रत्येक वर्षी खड्डे भरण्यासाठी लाखो रूपये खर्च होतात ,या रस्त्याला कायम स्वरूपी गटारे नसल्याने दर वर्षी लाखो रुपये वाया जातात त्यामुळे हा रस्ता डाम्बरी करणं व्हावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.