तब्बल 30 कोटींच्या खंडणीची मागणी : गुजरात-महाराष्ट्र पोलिसांची संयुक्त कारवाई,7 अपहरणकर्त्यांच्या आवळल्या मुसक्या
प्रतिनिधी / रत्नागिरी
अपहरण करून रत्नागिरीत आणलेल्या सुरत-गुजरात येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जितू पटेल यांची गुप्त ऑपरेशनद्वारे सुटका करण्यात आल़ी गुजरात व महाराष्ट्र पोलिसांच्या संयुक्त कारवाईने हे मिशन यशस्वी करण्यात आल़े यावेळी चंदन सोनार टोळीतील 7 अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून दोन महागडय़ा गाडय़ाही जप्त करण्यात आल्या आहेत़
अटक करण्यात आलेल्यांमध्ये पप्पू चौधरी, दीपक अलियाज, अरविंद यादव, अजमल हुसेन अंसारी, अयाज मोबीन अलियाज टकल्या, इशक मुनझवर, जितेश कुमार अलियाज अशा 7 जणांचा समावेश आह़े जितू पटेल हे गुजरातमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत़ ते उमरगा येथे आपल्या कुटुंबासोबत वास्तव्य करतात़ 22 मार्च 2021 रोजी उमरगा येथून त्याचे अपहरण करण्यात आले होत़े अपहरण करणाऱया टोळीने जितू पटेल यांना सोडण्यासाठी कुटुंqिबयांकडून 30 कोटी रूपयांच्या खंडणीची मागणी केली होत़ी या प्रकाराने हादरून गेलेल्या कुटुंबाने या घटनेची माहिती गुजरात पोलिसांत दिल़ी पटेल यांचे अपहरण केल्यानंतर या टोळीने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यांना रत्नागिरीमधील एका बंगल्यामध्ये डांबून ठेवले होत़े कुणालाही संशय येणार नाही, असा कडेकोट बंदोबस्त या टोळीकडून करण्यात आला होत़ा पटेल मुंबईत असल्याचा संशय गुजरात पोलिसांना आल्याने महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधण्यात आल़ा त्यानुसार गुजरात एटीएस, सुरत सिटी पोलीस, वालसाड पोलीस व महाराष्ट्र पोलीस यांची विविध पथके पटेल यांच्या शोधकार्यासाठी तयार करण्यात आल़ी तपासादरम्यान गुप्तहेरामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, पटेल रत्नागिरीत असल्याचे समोर आल़े त्यानुसार 28 मार्च रोजी पोलिसांकडून रत्नागिरी येथील बंगल्यात अचानक कारवाई करण्यात आल़ी यावेळी पोलिसांकडून पटेल यांची मुक्तता करतानाच 5 जणांना रत्नागिरी येथून ताब्यात घेण्यात आल़े त्यांच्याकडून प्राप्त माहितीवरून अन्य दोघाजणांना मुंबई येथून ताब्यात घेण्यात आल़े संशयित आरोपींकडून टोयाटो फॉर्च्युनर, होंडा सिटी अशा महागडय़ा गाडय़ा ताब्यात घेण्यात आल्या आहेत़ अटक करण्यात आलेले सर्व संशयित आरोपी बिहार येथील कुप्रसिद्ध चंदन सोनार टोळीमधील असल्याची माहिती समोर आली आह़े अशा प्रकाराचे अनेक गुन्हे या टोळीवर दाखल असल्याचेही स्पष्ट झाले आह़े दरम्यान गुन्हेगारीदृष्टय़ा शांत समजल्या जाणाऱया रत्नागिरीमध्ये आंतरराज्यीय टोळीने केलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.