केवळ मोजक्मया बसेस रस्त्यावर : खासगी वाहनांचा आधार : परिवहनला फटका
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या आठ दिवसांपासून परिवहनचे कर्मचारी संपावर गेल्याने बससेवेवर मोठा परिणाम झाला आहे. बेळगाव विभागातील काही प्रशिक्षणार्थी कर्मचाऱयांना बडतर्फ करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे काही कर्मचारी बससेवेत हजर झाले आहेत. त्यामुळे बसस्थानकातून मोजक्मया बसेस विविध मार्गांवर धावत असल्या तरी अद्याप प्रवाशांना खासगी वाहनांवरच अवलंबून रहावे लागत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला परिवहन कर्मचाऱयांच्या मागणीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे बससेवा विस्कळीत झाली असून प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. दरम्यान, शनिवारी बेळगावात लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यासाठी मोठय़ा प्रमाणात बसची गरज असते. मात्र, बससेवा अद्याप सुरळीत न झाल्याने मतदान काळात प्रशासनाला पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. जिल्हाधिकाऱयांनी निवडणुकीच्या कामासाठी महाराष्ट्र एसटी मंडळाची मदत घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र महामंडळानेही बससेवा पुरविण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे मतदान काळात महाराष्ट्राची लाल परी फिरणार आहे. बसस्थानकात प्रवाशांसाठी काही मोजक्मया बस थांबल्या असल्या तरी खासगी वाहनांची संख्या अधिक आहे. प्रवाशांची संख्या बसस्थानकात वाढत आहे. याचा फायदा खासगी वाहतूकदार उठवत आहेत. काही खासगी वाहनचालकांची मनमानी सुरू आहे. आठ दिवसांपासून बससेवा ठप्प झाल्याने परिवहनचे मोठे नुकसान झाले आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी व परिवहनचे नुकसान थांबविण्यासाठी राज्य सरकारने कर्मचाऱयांना सेवेत हजर होण्याचे आवाहन केले होते. मात्र, कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे परिवहनने प्रशिक्षणार्थी व कामावर हजर झालेल्या कर्मचाऱयांच्या सहकार्याने विविध मार्गांवर बसफेऱया सुरू केल्या आहेत. मात्र, अद्याप स्थानिक व लांब पल्ल्यांसाठी संपूर्ण बस धावत नसल्याचे दिसत आहे. राज्यात चार परिवहन मंडळांतर्फे बससेवा पुरविली जाते. या परिवहन मंडळांतून तब्बल 23 हजार बस विविध मार्गांवर धावतात. मात्र, सध्या या सर्व बस जागेवर थांबून असल्याने परिवहनच्या महसुलावर मोठा परिणाम झाला आहे. आधीच कोरोनामुळे गेल्या वर्षभरात परिवहन महामंडळाला 587 कोटी 77 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शिवाय कर्मचाऱयांनी डिसेंबरदरम्यान चार दिवस आंदोलन छेडले होते. सध्या गेल्या आठ दिवसांपासून बससेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे परिवहनला मोठा फटका बसला आहे.