नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. केंद्र सरकारकडून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत, मात्र कोरोना संसर्ग आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा मोदी सरकारवर सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, केंद्र सरकारची कोविड रणनीती –स्टेज १ – तुघलकी लॉकडाउन लावा, स्टेज २ – थाळी वाजवा आणि स्टेज ३ – प्रभूगान, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचा पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारवर सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधला होता. राहुल गांधी ट्वीट करत म्हटले होते की, ना चाचण्या, ना रूग्णालयात बेड, ना व्हेंटिलेटर्स, ना ऑक्सिजन, लस देखील नाही. केवळ एक उत्सवाचे ढोंग आहे. पीएम केअर्स?.