पश्चिम भागात काजू उत्पादनाला सुरुवात : कोरोनाच्या संकटामुळे बाजारपेठाही बंद
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव तालुक्मयातील पश्चिम भागात काजू उत्पादनाला सुरुवात झाली आहे. मात्र शेजारील महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन आणि बेळगावात कर्फ्यू लागू करण्यात आल्याने काजू उत्पादक शेतकऱयांसमोर चिंतेचे सावट पसरले आहे. काजू उत्पादनाच्या तोंडावरच कोरोनाने पुन्हा हाहाकार माजविल्याने काजू उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. गतवषी देखील कोरोनाने हाहाकार माजविल्याने काजू उत्पादक अडचणीत आले होते. त्यातच यंदा देखील कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे काजू विक्रीचा प्रश्न शेतकऱयांसमोर उभा ठाकला आहे.
तालुक्मयाच्या पश्चिम भागातील बेळगुंदी, सोनोली, बेळवट्टी, बिजगर्णी, कावळेवाडी, बडस, राकसकोप, बाकनूर, कर्ले, बाची, कल्लेहोळ, कोनेवाडी, कुद्रेमनी, अतिवाड, बेकिनकेरे, बसुर्ते आदी भागात मोठय़ा प्रमाणात काजूचे उत्पादन घेतले जाते. दरवषी उत्पादित काजू बेळगुंदी व तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील आठवडी बाजारात विकली जाते. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे बाजारपेठा बंद आहेत. शिवाय कर्नाटकात नाईट-विकेंड कर्फ्यू लागू करण्यात आल्याने काजूच्या विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे काजूच्या मालाची ने-आण करणे देखील मुश्कील झाले आहे. दोन वर्षांपूर्वी काजूला साधारण 150 ते 160 रुपयांपर्यंत प्रतिकिलो दर मिळाला होता. मात्र अद्याप काजू विपेते व बाजारपेठाच सुरू नसल्याने दरदेखील निश्चित झाला नाही. काजूच्या उत्पादनाला सुरुवात झाली की गावोगावी येवून विपेते काजूची उचल करतात. मात्र यंदा कोरोनाच्या धास्तीने काजू विपेते फिरकलेच नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.