ऑनलाईन टीम / तिरुअनंतपुरम :
मागील चार दशकांपासून केरळमध्ये प्रत्येक पाच वर्षांनी सत्तांतर होत होते. हा इतिहास आज मोडीत निघाला असून, राजकीय इतिहासाला कलाटणी मिळाली. केरळच्या मतदारांनी पुन्हा एकदा राज्याची सत्ता मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारकडे सोपवल्याचे आतापर्यंतच्या निकालावरून स्पष्ट होते.
केरळमध्ये विधानसभा निवडणुकीच्या 140 जागांसाठी माकपप्रणित एलडीएफ आणि काँग्रेसप्रणित यूडीएफ यांच्यात मुख्य लढत होती. बहुमतासाठी 71 जागांची आवश्यकता आहे. एलडीएफने 99 जागांवर मुसंडी मारली असून, 40 जागांवर पुढे असलेला यूडीएफ पुन्हा विरोधी बाकांवर बसणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.