सध्या रासायनिक खतांच्या भरमसाट आणि अशास्त्राrय उपयोगामुळे भूमीची सुपीकता घटत चालली आहे. जमिनी क्षारपड होत आहेत. त्यामुळे शेतकऱयाला अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने त्याची अवस्था दिवसेंदिवस कठीण होत आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आता गावोगावचे शेतकरी एकत्रित येऊन स्वतःच प्रयत्न करू लागले आहेत. ब्रजकिसान एफपीओ ही संस्था शेतकऱयांचे प्रबोधन करण्याच्या कामी पुढाकार घेत आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी रासायनिक खतांऐवजी शेणखत आणि नैसर्गिक साधनांचा उपयोग तसेच विषारी किटनाशकांऐवजी वनस्पतीजन्य औषधांचा उपयोग करण्यासाठी शेतकऱयांना उद्युक्त केले जात आहे. ब्रज जिल्हय़ातील 50 गावांमधील शेतकऱयांनी एकत्र येऊन या सर्व गावांमधील जमिनीचा पोत सुधारण्याची प्रतिज्ञा केली आहे.
या संस्थेचे संचालक संतोष सिंग यांनी एक पंचवार्षिक कार्यक्रम तयार केला असून जमिनीची सुपीकता पुन्हा मिळवून देण्यासाठी एक सूत्र बनविले आहे. त्यानुसार शेतकऱयांनी कार्य केल्यास जमिनीची उत्पादनक्षमता दुपटीहून अधिक वाढते, असे दिसून आले आहे. शिवाय जमिनीतील पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त असणाऱया चांगल्या जीवाणूंचे संवर्धन या सूत्रामुळे होते. परिणामी निसर्गाच्याच साहाय्याने भरघोस उत्पादन घेता येते, असे दिसून आले आहे. जैविक शेती करण्यासाठी शेतकऱयांना प्रवृत्त केले जात असून कंपोस्ट खत, शेणखत, गांडूळ खत तसेच वनस्पतींच्या पाने आणि इतर भागांपासून निर्माण केलेले खत गावातच तयार करून ते सर्व शेतकऱयांना त्यांच्या त्यांच्या जमिनीच्या प्रमाणानुसार देणे, रासायनिक खतांऐवजी या खतांचा उपयोग करणे, एका जमिनीत वर्षानुवर्षे एकच पीक घेण्याऐवजी गाठयुक्त मूळे असणाऱया कडधान्यांच्या रोपांची लागवड करणे इत्यादी अनेक टप्प्यांमधून जमिनीचा विकास साधता येतो, असे अनुभवास आले आहे.