पाणी पुरवठा खंडीत असल्याने नागरिकांचा संताप अनावर
प्रतिनिधी/ सातारा
शहर परिसरातील विविध भागांमध्ये सध्या भुयारी गटारांचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 17 मध्ये पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागल्याने या परिसरात पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. परिसरातील संतप्त नागरिकांनी नगरसेवक विजय काटवटे यांना जाब विचारला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेताच नगरसेवक काटवटे यांनी ठेकेदाराची चांगलीच कानउघडनी करून त्याला येथील पाणी पुरवठा सुरळीत करून देण्याच्या सुचना केल्या.
प्रभाग क्रमांक 17 परिसरात ही भुयारी गटारीचे कामकाज सुरू असल्याने संबंधीत विभागातील कर्मचाऱयांतर्फे विविध ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने खुदाई करण्यात आली होती. यातच मागील 21 दिवसांपुर्वी येथील पिण्याच्या पाईप लाईनलाही गळती लागली. त्यामुळे या परिसरातील पाणी पुरवठाच ठप्प झाला. आधीच कोरोनाची धास्ती त्यातच पिण्याच्या पाण्यासाठी या भागातील नागरिकांना वनवन फिरावे लागत होते.
त्यामुळे संतत्प नागरिकांनी येथील नरसेवकांना याचा शनिवारी जाब विचारला. नगरसेवक काटवटे यांनी ही ठेकेदाराला त्वरीत बोलावुन घेतले. तसेच येथे पाईप लाईनची दुरूस्ती ही त्वरीत खरावी असे सांगुन त्याला चांगलेच खडसाविले. तसेच येथील काम लवकरात लवकर करण्याचे आदेश ही दिले. ठेकेदाराने ही दुरूस्ती त्वरीत सुरू करण्यात असल्याचे सांगितले.