कोरोनाची लाट ओसरते, ओसरते असे म्हणता म्हणता ती ग्रामीण महाराष्ट्रात पसरायला लागली आहे. विशेष करून दक्षिण महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली या जिह्यांसह कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यात ग्रामीण भागात वाढती रुग्ण संख्या आणि रुग्णांचे मृत्यू हा चिंतेचा विषय बनला आहे. मराठवाडा आणि उत्तर कर्नाटकातील मराठी प्रदेशही कोरोनाच्या आगीत होरपळत आहे. कडक निर्बंध असतानाही हा आकडा कशामुळे वाढतो आहे याची जाणीव असली तरीही त्याविरोधात बोलायचे कोणी असा प्रश्न निर्माण झाला आणि हा संपूर्ण पट्टा आज कोरोनाच्या जबडय़ात सापडला आहे. ही भय वाटावी अशी स्थिती असली तरीही मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या भागातून जर तो हटवणे शक्मय आहे तर या भागातूनही त्याचे उच्चाटन होऊ शकते. मात्र त्यासाठी पक्के नियोजन, उत्तम अंमलबजावणी असणे गरजेचे बनलेले आहे. त्यादृष्टीने उपलब्ध आकडेवारी पाहून घाबरून जाण्यापेक्षा भविष्यासाठी चांगला उपयोग करण्याची आवश्यकता आहे. कोरोना बाधितांच्या प्रमाणात सातारा राज्यात 32… इतका सर्वात आघाडीवर पोहोचला आहे. त्यापाठोपाठ परभणी 27, उस्मानाबाद 26, सिंधुदुर्ग 24, रत्नागिरी 22 आणि सांगली 21… असे प्रमाण आहे. कोल्हापूर जिह्यात राज्यातील सर्वात मोठी मृत्यू वाढ झाली आहे. शासकीय आकडेवारीनुसार कोल्हापूरला गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत 53…ने मृत्यू संख्या वाढली आहे. या आठवडय़ात 844 मृत्यू झाले असून बीड 24…, सोलापूर 20, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग 16… इतकी मृत्यू वाढ आहे. दररोज प्रत्येक जिह्यामध्ये सरासरी एक हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. अर्थात बरे होणाऱयांची संख्याही आता वाढू लागले असली तरी विषाणूंच्या वाढत्या विळख्यामुळे बाधितांचे प्रमाण 20 ते 30… वर पोहोचले आहे. गतसालापेक्षा रुग्णसंख्या तिपटीने अधिक आहे. पहिल्या लाटेचा चांगला मुकाबला केल्यानंतर दुसऱया वेळी एवढी रुग्ण वाढ का होत आहे यावरच खरेतर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. गतवषी जनतेने टाळेबंदी नाईलाजाने स्वीकारली याचे कारण, सरकारी यंत्रणेला जय्यत तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ आणि साखळी तोडायची होती. यावेळी ती तुटता तुटेना. गतवषी अंधारात तलवार चालत होती. म्हणूनच प्रतिकूल परिस्थितीत झटणाऱया डॉक्टरांना, शासकीय अधिकाऱयांना, लोकप्रतिनिधींना जनतेने कोरोना योद्धे मानले. मात्र चौदा महिन्यानंतर त्याच नजरेने पाहता येणे अशक्मय आहे. आता लोकांना टाळेबंदी नकोशी झाली आहे. त्यांच्याकडे असणारी सारी श्रीशिल्लक संपली आहे. जगण्यासाठीच पैसा नाही. त्यातच जर लागण झाली तर संपूर्ण घरदार उद्ध्वस्त होते या भीतीने ग्रामीण भाग धास्तावला आहे. पण जगण्यासाठीची धडपड त्यांना गप्प बसू देत नाही. ग्रामीण भागात तर आता पेरणीची लगबग सुरू होणार आहे. साधने, पैशाच्या उभारणीसाठी धडपड सुरू असते पण यंदा दवाखान्यात उपचारांसाठी धावपळ सुरू आहे. दुसऱया लाटेला सर्व घटकांनी सहजावरी घेतल्याचा हा परिणाम जाणवतो आहे. गतवेळच्या वैद्यकीय खर्चाची दहशत इतकी आहे की लोक घरात राहूनच उपचार घेण्यास पसंती देत आहेत. त्यात शासनाने फारसा फटका न बसलेल्या रुग्णांना घरीच अलगीकरणात राहून उपचाराची संमती दिली. स्वस्थ रुग्ण रस्त्यावर फिरू लागले. लोकांशी संपर्क करू लागले. कोरोना झाला आहे हे लपवून वर्तन करू लागले. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत असे सुस्थितीत वाटणारे लोक आपले नित्य व्यवहार करत राहिले. साहजिकच उपचारांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आणि ऑक्सिजन घटला, संसर्ग वाढला म्हणून मग ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरची सुविधा असणाऱया दवाखान्याचा शोध घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. या दरम्यानच्या काळात अनेकांना त्यांनी संसर्गित केले. आपल्या भागात कोरोना नाही अशा अविर्भावात मास्क, सामाजिक आंतर न ठेवणाऱया व्यक्तींना त्याचा फटका बसला. तो त्याच्या कुटुंबात ज्ये÷ आणि अशक्त लोकांपर्यंतही पोहोचला. मग ही परिस्थिती सावरणे कोणाच्याही हाती राहिले नाही. ग्रामीण व्यवस्था बळकट करण्याचे काम या दरम्यान ज्या त्या जिह्यांमधील प्रशासकीय अधिकाऱयांनीही पूर्ण क्षमतेने केले नाही. परिणामी शहरात किंवा मुंबईत असे रुग्ण घेऊन जाण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर आली. गेल्या काही दिवसांमध्ये ग्रामीण भागात प्रसार अशा कारणांमुळे अधिक मोठय़ा प्रमाणात झाला आहे. शहरी भाग सावरत असताना ऐन पावसाळय़ाच्या आणि शेतीची कामे सुरू होण्याच्या काळात हे संकट ग्रामीण भागासमोर उभे ठाकले आहे. ग्रामीण शेतकऱयाची रोगप्रतिकारक शक्ती सर्वसामान्य शहरी व्यक्तींपेक्षा अधिक आहे हे मान्यच. मात्र नियम पाळले, रुग्णांना गावोगावी अलगीकरण कक्ष स्थापन करून ग्राम समित्यांच्या देखरेखीखाली, डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचारात ठेवले तर ग्रामीण भागातील हे संकट लवकर दूर होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय अधिकाऱयांनी गाव पातळीवर लोकांशी थेट संपर्क साधणे, त्यांना विश्वासात घेऊन कारभार चालवणे आणि वैद्यकीय यंत्रणा, औषधे यासह विविध वस्तू पुरवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोकणात अनेक तालुक्मयांमध्ये लोकांनी मोठय़ा कंपन्यांच्या सीएसआर फंडातून मोठय़ा प्रमाणात मदत मिळवून ग्रामीण व्यवस्था बळकट केली आहे. असे काम प्रशासनालाही जमले नसते. गतवषी मोठय़ा प्रमाणात निधी खर्च पडून अशी व्यवस्था उभी राहिली नाही हे वास्तव आहे. त्यामुळे आतातरी या कारभारात सुधारणा झाली आणि ग्रामीण लोकशक्तीचा सदुपयोग केला गेला तरच ग्रामीण भाग कोरोनाच्या जबडय़ातून बाहेर पडेल. शासकीय अधिकाऱयांच्या हो ला हो जोडत कारभार करणाऱया लोकप्रतिनिधींनी आणि मंत्र्यांनी निदान या क्षणी तरी निर्णय क्षमता दाखवून द्यावी, प्रशासनाला कार्यरत करावे आणि लोकांच्या उपयोगात यावे हीच जनतेची अपेक्षा आहे.
Previous Articleपिंगलेचे मनोगत
Next Article पुणे-मुंबई-पुणे
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.