प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये एका दिवसात प्रथमच 3 हजार 390 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत़ यामध्ये 582 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ शासनाच्या नियमानुसार प्रत्यक रूग्णामागे 20 याप्रमाणे दिवसाला 12 हजार चाचण्या होणे अपेक्षित होत़े तरीदेखील प्रशासनाला उशीरा का होईना जाग आली असून चाचण्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े त्यानुसार 3 हजाराहून अधिक चाचण्या घेण्यात आल्य़ा
रत्नागिरी जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट सद्यस्थितीत 17.82 आह़े याचे मुख्य कारण कमी प्रमाणात होणाऱया कोरोना चाचण्या असल्याचे म्हटले जात होत़े कमी चाचण्यांमुळे रूग्णसंख्याही आटोक्यात येण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्य़ा यामुळे प्रशासनाने चाचण्या वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आह़े शुक्रवारी आढळून आलेल्या 582 नव्या रूग्णांचा विचार करता सुमारे 12 हजार चाचण्या अपेक्षित होत्या. त्यामुळे अजुनही रूग्णसंख्येच्या तुलनेत 9 हजार चाचण्या कमी होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आह़े
सोमवारी जिल्हा रूग्णालयाकडून करण्यात आलेल्या 3 हजार 390 चाचण्यांपैकी आरटीपीसीआर चाचणीत 374 तर ऍन्टीजेन चाचणीत 208 नवे रूग्ण आढळून आल़े असून 10 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 4 चिपळूण 2, राजापूर 3, संगमेश्वर 1 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल़ा यामुळे मृतांची एकूण संख्या 1 हजार 330 झाली आह़े रत्नागिरी जिह्याचा मृत्यूदर 3.35 तर पॉझिटिव्हीटी रेट 17.82 झाला आह़े