बेळगाव : शहर आणि उपनगरात कुत्र्यांनी माणसांचा चावा घेण्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा कंग्राळ गल्ली येथील तुषार जाधव या तऊणाच्या पायाचा चावा भटक्या कुत्र्याने घेतला. त्यामुळे परिसरात पुन्हा घबराट निर्माण झाली. कुत्र्याने चावा घेतल्याने वाढदिनीच ऊग्णालयात दाखल होण्याची वेळ या तऊणावर आली. कुत्री माणसांचे लचके तोडत आहेत आणि महानगरपालिका कारवाई सुरू आहे असे सांगत आहे. कारवाई होत असेल तर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त पूर्ण का झाला नाही? हा प्रश्न अनुत्तरित आहे. मागील आठवड्यात 4 आणि 5 वर्षांच्या लहान बालकांवर कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केले होते. त्यानंतर अन्य भागातदेखील कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना निदर्शनास आली होती. या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी नसबंदी उपक्रम राबविला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. ठोस कारवाई केली जात नसल्याने शुक्रवारी सकाळी खासगी ठिकाणी कामाला निघालेल्या तुषार या युवकाच्या पायाचा चावा भटक्या कुत्र्याने घेतला. कुत्र्याचे तीक्ष्ण दात त्याच्या पायात घुसल्याने तो कळवळला. उद्योजक आप्पासाहेब गुरव यांनी त्वरित त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून आणखी किती जणांनी कुत्र्यांचे लक्ष्य व्हायचे? असा प्रश्न नागरिक करीत आहेत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरले असून शेकडो तक्रारी दाखल होऊनही महापालिकेकडून ठोस कारवाई करण्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. या कुत्र्यांचा हल्ला रोखण्यासाठी महापालिकेकडून कडक धोरण राबविण्यात यावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
Previous Articleसात अट्टल दरोडेखोरांना अटक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.