वार्ताहर /धामणे
मुसळधार पावसाने शेतकऱयांच्या पिकांचे नुकसानभरपाई शासनाकडून देण्यात येणार असून ही नुकसानभरपाई मिळविण्यासाठी ज्या शेतकऱयांची शेती जायंट अकाउंटवर आहे. त्या शेतकऱयांनी उताऱयावरील सर्वांच्या सहय़ानिशी 20 रुपयाच्या बाँड देण्यात यावा असा आदेश प्रशासनाने काढला आहे. या आदेशा विरोधात भारतीय कृषक समाज जिल्हा रयत संघटनेच्यावतीने जिल्हा अधिकाऱयांना दि. 16 रोजी निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे की, शेतकऱयांची शेती ही जिल्हय़ात 80 टक्के शासन दप्तरात सुरळीत नोंद नसून प्रत्येक शेतकऱयांच्या भाऊबंधीत फुट हिसे होवून दाखल झालेले नाहीत.
त्यामुळे आता शेतकऱयांना नुकसान भरपाईसाठी 20 रुपयाचा बॉन्डची अट रद्द करुन या पूर्वी प्रमाणे शेतकऱयांना नुकसान भरपाई द्यावी. त्याचप्रमाणे यापुढे जिल्हा प्रशासनाने शेतकऱयांना आपापली शेतजमिनीचे उतारे कागदपत्र सुरळीत करुन घेण्यासाठी ठरावीक महिन्याची मुदत देवून हे सर्व करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शेतकऱयांना मदत करावी असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी रयत संघटनेचे राजकार्यदर्शी रामचंद्र पाटील, जिल्हा अध्यक्ष रमेश वाली, उपाध्यक्ष पंडित पाटील, जिल्हा कार्यदर्शी राजू गणाचारी, तालुका अध्यक्ष संजू डोंगरगावी, बाहुबली हणमगौंड, रमेश राम गोंडन्नावर आदी उपस्थित होते.