अनुजा कुडतरकर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर सावंतवाडी संस्थानात एका खटल्यानिमित्त वकील म्हणून आले होते . सावंतवाडीत १९३५ मध्ये तत्कालीन सावंतवाडी संस्थानातील पडवे गावचे जमीनदार श्री . वराडकर यांचा खून झाला होता . श्री वराडकर यांच्या खुनाच्या खटल्यातील आरोपी टिपगो महार यांचे वकील या नात्याने डॉ . बाबासाहेब आंबेडकर सावंतवाडीत आले होते. डॉ . आंबेडकरांची भेट तेव्हा सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत बापूसाहेब महाराज यांच्याशी भेट झाली . या खटल्यातील न्यायदानाच्या विश्लेषणाने डॉ . आंबेडकर प्रभावित झाले होते . या खटल्यात बाबासाहेबांनी आरोपीचे वकील या नात्याने बाजू मंडळी होती . आणि त्यावेळी बाबासाहेबांनी आरोपीची मांडलेली बाजू ऐकून न्यायाधीश असलेले शश्रीमंत बापूसाहेब महाराजांनी आरोपीस शिक्षा देऊन जन्मठेप सुनावली होती .हि घटना सावंतवाडी स्थानासाठी खरतर भाग्याची म्हणावी लागेल . कारण एवढ्या मोठ्या महामानवाचे पाय सावंतवाडी संस्थानात पडले ही या संस्थांनासाठी मोठी घटना होती . यावेळी बाबासाहेबांची सभाही झाली आणि दोन महान व्यक्तींची या खटल्यानिमीत्त भेटही झाली ती म्हणजे बापूसाहेब महाराज आणि डॉ . बाबासाहेब आंबेडकर ! आणि याच्याच समरणाप्रीत्यर्थ स्मारकही उभारण्यात आलं . हे स्मारक आजही या महान व्यक्तिमत्वांचे चिरसमरण ठेवतं !