येत्या काळात पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत. तसेच केवळ विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सरकारला पाठींबा देत आहोत असे त्यांनी म्हटले आहे. तसेच आम्ही शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करू शकतो तर भाजपबरोबर का नाही असा सवाल राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज शपथविधीनंतर माध्यमांशी संवाद साधला.
राजभवनावर झालेल्या शपथविधीनंतर बोलताना अजित पवार म्हणाले, “सध्या देशपातळीवरील राजकिय परिस्थिती पहाता विकासाला पाठींबा देणे महत्वाचे आहे. यावर आम्ही खुप विचार करूनच निर्णय घेतला आहे. देशाच्या विकासाला पाठींबा देण्यासाठीच आम्ही मोदींना पाठींबा दिला आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “देशात विरोधी पक्ष एकत्र येत असताना त्यातून काही निष्पण होत नाही. केंद्रात पंतप्रधान अतिशय चांगले काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपला पाठींबा देत आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहीजेत, युवकांना संधी मिळाली पाहीजे यासह अनेक मुद्यावर राष्ट्रिय आणि राज्यातील राजकारणात भाजपबरोबर जाण्यास आम्ही उत्त्सुक आहे.”असे ते म्हणाले.
शेवटी बोलताना त्यांनी “शुक्रवारीच मी विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. महाविकास आघाडीमध्ये मंत्रिपद भुषवलेल्यांना पुन्हा संधी देण्यात येईल. तसेच पक्षात नविन चेहऱ्यांनाही संधी देण्यात येणार आहे. राज्यात येणाऱ्या निवडणूका ह्या राष्ट्रवादीच्या चिन्हावरच लढवणार आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील सर्व आमदार आमच्या बरोबर आहेत” असेही अजित पवार म्हणाले.