सरकार कोणत्याच विषयावर उत्तर देत नसून राज्यातलं सरकार कोणतेच काम करत नाही ते फक्त झोपा काढत आहे. धरणे आटू लागले आहेत. मात्र सरकारला कोणतच गांभीर्य नाही. राज्यात फक्त धार्मीक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त दाढी कुरवाळत बसतात असेही अजित पवार म्हणाले. ते आज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत बोलत होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टिच्या वर्धापन दिनानिमित्त आज मेळावा आयोजीत केला होता. यामेळाव्यासाठी पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर राष्ट्रिय कार्याध्यक्ष प्रप्फुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावरून बोलताना अजित पवार म्हणाले, “एकनाथ शिंदे म्हणतात की, तुम्ही माझ्यावर सतत टीका का करता? तुम्ही कामच करत नाही केवळ दाडी कुरवाळत बसता…काम करा मी कौतुक करेन….गुवाहाटी गोवा फिरुन आलात ते असले धंदे करायला आलात का?” असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, “मुख्यमंत्री सुरत, गुवाहाटी आणि गोव्याला जाऊन दोन- चार राज्य फिरून आले. आमच्या शेतकऱ्यांचे वाटोळे करायला फिरुन आलात का ? महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा कापूस विकला जात नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्याला दर नाही. तो आता हैदराबादला जाऊन कांदा चारपटीच्या भावाने विकायचा विचार करतोय. कांद्याला भाव हैदराबाद देऊ शकते मग मुंबईमद्ये कानाही देऊ शकत? त्यांच्यापेक्षा आपले राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. जर ते लोक समाधानी राहू शकतात. आपण का नाही राहू शकत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काहीच करु शकत नाहीत.” असेही ते म्हणाले.