सबळ अपुराव्याअभावी न्यायालयाचा निकाल : 13 वर्षे चालला खटला
प्रतिनिधी /वाळपई
2009 साली केरी सत्तरी येथील पट्टेरी वाघाच्या हत्याप्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आलेल्या सर्व आरोपींची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. यामध्ये गणेश माजीक, नागेश माजिक, सूर्यकांत माजिक, अंकुश माजिक, भिवा गावस पाच जणांचा समावेश आहे. गेल्या 13 वर्षांपासून सदर प्रकरण न्यायप्रवि÷ होते. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी झाली.
सत्तरी तालुक्मयातील केरी सत्तरी येथील पट्टेरी वाघाच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आले होते. यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठय़ा प्रमाणात खळबळ माजली होती. रानडुकरांसाठी सापळा लावला होता यात वाघ अडकला.
दरम्यान, केरी सत्तरी येथील लोकवस्तीपासून अवघ्याच अंतरावर डोंगराळ भागांमध्ये रानडुकराच्या शिकारीसाठी एक सापळा रचला होता. सदर सापळय़ात एक हरीण अडकले होते. या हरणाची शिकार करताना त्यामध्ये पट्टेरी वाघ अडकला होता. काही दिवसांनंतर सदर भागातील काही नागरिक या भागांमध्ये गेले असता त्यांना सापळय़ात पट्टेरी वाघ अडकल्याचे दृष्टीस पडले.
प्रकरण दडपण्यासाठी केले वाघाचे दहन
पट्टेरी वाघाची हत्या झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर भागांमध्ये खळबळ निर्माण झाली होती. सदर प्रकरण बऱयाच प्रमाणात गंभीर असून यामुळे आपल्या अंगावर शेकण्याची शक्मयता आहे. यामुळे काहींनी सदर प्रकरण दडपण्याच्या उद्देशाने पट्टेरी वाघाचे दहन करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही जणांनी या संदर्भाचा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर हे प्रकरण अधिकच चिघळले.
एका वर्तमानपत्रांमध्ये याबाबतची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वत्र खळबळ निर्माण झाली. वनखात्याने याची गंभीर दखल घेतली. या संदर्भाचे पुरावे गोळा करून ते चाचणीसाठी डेहराडून येथे पाठविण्यात आले होते. या चाचणी अहवालामध्ये हत्या करण्यात आलेला वाघ पट्टेरी जातीचा असल्याचे स्पष्ट झाले होते. या चौकशी अंतर्गत गणेश माजिक, नागेश माजिक, सूर्यकांत माजिक, अंकुश माजीक, भिवा गावस यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांना अटक करून त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
2010 साली या प्रकरणी न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतरचा खटला गेल्या तेरा वर्षे चालला. याबाबत मंगळवारी सुनावणी झाली. यामध्ये न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
ज्यावेळी सदर प्रकरण घडले होते. त्यावेळी केरी भागांमध्ये वातावरण तंग बनले होते. या भागात वास्तव्य करणारे पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर वाघाच्या हत्येचे प्रकरण उचलून धरले. त्यानंतर संशयितांना अटक करून या प्रकरणी ठपका ठेवण्यात आला होता.