रामलिंगखिंड गल्ली रूंदीकरणात घर गेलेल्या हट्टीकर कुटुंबीयांची परवड कधी थांबणार? : कलामंदिर क्वॉर्टर्सही पाडण्याचे काम सुरू होणार
प्रतिनिधी /बेळगाव
रामलिंगखिंड गल्ली रस्ता रुंदीकरणात दुकाने गेल्याने उदरनिर्वाहाचे साधन गेले. तसेच घरदेखील गेल्याने शांता हट्टीकर या वृद्धेच्या कुटुंबीयांची परवड सुरूच आहे. आधी कोनवाळ गल्ली गेस्ट हाऊस….त्यानंतर कलामंदिर येथील मोडकळीस आलेल्या क्वॉटर्समध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र व्यापारी संकुलासाठी इमारत पाडण्यासाठी जेसीबी दारात आल्याने अचानक कुठे जायचे? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. यामुळे हट्टीकर कुटुंबीयांचा राहण्याचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे.
महापालिका प्रशासन नुकसानभरपाई देण्यास तयार नाही. बेघर झालेल्या कुटुंबाची पडक्या इमारतीत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पण पडकी इमारतदेखील हटविण्यासाठी सोमवारी जेसीबी दारात दाखल झाल्याने काय करायचे? असा प्रश्न हट्टीकर कुटुंबीयासमोर उपस्थित झाला. त्यामुळे हट्टीकर कुटुंबीयांची परवड कधी थांबणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. या इमारतीमधून हटविल्यास त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. मात्र महापालिका प्रशासनाचे अधिकारी सुस्तच आहेत. पण नुकसानभरपाई दिल्याखेरीज इमारतीमधून हलणार नाही, अशी भूमिका हट्टीकर कुटुंबीयांनी घेतली आहे.
महापालिकेच्यावतीने रामलिंगखिंड गल्ली रस्त्याचे रुंदीकरण करून अनेक मालमत्ता आणि अतिक्रमणे हटविली. रुंदीकरणात शंभर टक्के नुकसान होणाऱया मालमत्ताधारकांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा करण्यात आली. पण याची अंमलबजावणी करण्याचा विसर महापालिका प्रशासनासह अधिकाऱयांना पडला आहे. नुकसानभरपाई देण्याचा ठराव केवळ कागदावरच राहिला आहे. रामलिंगखिंड गल्ली रस्ता रुंदीकरणास मालमत्ताधारक आणि व्यावसायिकांचा विरोध होता. पण शंभर टक्के नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्यात येईल. तसेच अन्य नुकसानधारकांना तातडीने इमारत बांधकाम परवाना देण्याची घोषणा करण्यात आली. तसेच विकास शुल्क माफ करण्याचा ठराव घेण्यात आला. पण याचा लाभ काही मोजक्मयाच मालमत्ताधारकांना झाला आहे.
रामलिंगखिंड गल्लीत अनंतशयन गल्लीच्या कोपऱयावर शांता हट्टीकर यांच्या कुटुंबीयांची चार दुकाने आणि राहते घर होते. रस्त्याचे रुंदीकरण 60 फूट करण्यात आल्याने दुकाने आणि घरे पूर्णतः हटविण्याची कारवाई महापालिकेच्या अभियंत्यांनी केली. केवळ दीड फूट जागा शिल्लक राहिल्याने इतक्मया जागेत राहणार कसे? असा मुद्दा उपस्थित झाला. यामुळे नुकसानभरपाई देण्याची मागणी करून महापालिका कार्यालयात त्यांनी ठाण मांडले. यामुळे शांता हट्टीकर यांची कोनवाळ गल्ली येथील मनपाच्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. पण त्याठिकाणी पावसाचे पाणी साचू लागल्याने राहणे मुश्किल बनले. यामुळे त्यांचे कलामंदिरच्या मागे असलेल्या मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आले. पण याठिकाणी बहुमजली व्यापारी संकुल उभारण्यात येत असल्याने यापूर्वीच क्वॉटर्समधील कर्मचाऱयांना पर्यायी व्यवस्था करून देऊन क्वॉटर्स रिकामी करण्यात येणार आहे. यामुळे कर्मचाऱयांनी घरे रिकामी केली. पण हट्टीकर कुटुंबीयांच्या राहण्याचा तिढा संपुष्टात आला नाही.
मागील सात वर्षांपासून घराच्या प्रतीक्षेत
सोमवारी दुपारी इमारत हटविण्यासाठी जेसीबीसह साहाय्यक कार्यकारी अभियंत्या दाखल झाल्याने आता अचानक कुठे जायचे? असा मुद्दा उपस्थित झाला. पर्यायी व्यवस्था करून द्यावी. तसेच एक दिवसाचा अवधी देण्याची मागणी हट्टीकर कुटुंबीयांनी अभियंत्याकडे केली असता, एक तासात घर रिकामी करा, अशी सूचना केली. घरात मुली असल्याने मुलींना घेऊन कुठे फिरायचे? असा मुद्दा साक्षी शंकर हट्टीकर यांनी उपस्थित केला. 2015 मध्ये रामलिंगखिंड रस्ता रुंदीकरणात संपूर्ण घर गेले असून मागील सात वर्षांपासून घराच्या प्रतीक्षेत आहे. पण महापालिका प्रशासनाने अद्याप नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे हट्टीकर कुटुंबीयांची परवड कधी थांबणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.