ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज CBI च्या विशेष न्यायालयाने फेटाळला. त्यामळे देशमुखांचा CBI कोठडीतला मुक्काम वाढला आहे. अटकेच्या पाच महिन्यानंतरही देशमुखांना जामीन मिळू शकला नाही, हीदेशमुखांसाठी चिंतेची बाब आहे. तर दुसरीकडे कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचेही डिफॉल्ट जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत.
100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणाचा सीबीआयकडून तपास सुरू आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना शहरातील रेस्टॉरंट आणि बारमधून दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुली करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, देशमुखांनी हे आरोप फेटाळले होते. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सीबीआयला त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. देशमुख सध्या सीबीआय कोठडीत आहेत.
मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास ईडीकडूनही सुरू आहे. सीबीआयनेही देशमुख आणि संजीव पालांडे, कुंदन शिंदे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. एप्रिलमध्ये सीबीआयने भ्रष्टाचार प्रकरणात देशमुख, पालांडे आणि शिंदे यांना ताब्यात घेतले होते.
हेही वाचा : भीमाशंकरजवळील पोखरी घाटात दरड कोसळली, एकेरी वाहतूक सुरू