व्हनाळी – वार्ताहर
शेतक-यांचे कैवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेटट्टी यांनी ऊस दर निश्चित करण्यासाठी दि. 7 नोव्हेंबर रोजी ऊस परिषद घेण्याचे जाहिर केले आहे. त्यांना जाहिर पाठिंबा व्यक्त करण्याकरीता आम्ही आमचा श्री अन्नपुर्णा जॅगरी पावडर प्रकल्प दि.3 नोव्हेंबर दुपार नंतर बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय संचालक मंडळाने व कारखाना प्रशासनाने घेतला असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी दिली.
दरम्यान, शेतक-यांचे नुकसान होवू नये म्हणून तुटलेला ऊस व प्रक्रियेत असलेला माल काढून घेवून दि. 3 नोव्हेंर दुपार नंतर ऊस तोडी व प्रकल्प पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय कारखाना प्रशासन व संचलाक मंडळाने घेतला असून यंदा आवर्षणग्रस्त परिस्थिती व काळामावाडी धरणाची गळती दुरूस्तीमुळे माळराणच्या शेताला पाणी मिळेणासे झाले आहे शिवाय अनेक विहीरींनी पाण्याचा तळ गाठला आहे. त्यामुळे अशा शेतक-यांना दिलासा देणे ही गरजेची बाबा बनली आहे. सर्व शेतकरी बांधवाना माझी विनंती आहे की,अधिक अधिक ऊस कसा जोपासता येईल यासाठी प्रयत्न करावेत कारण पुढील वर्षी ऊसाला अधिक दर मिळेल अशी अपेक्षा आहे असेही घाटगे म्हणाले.