प्रतिनिधी / बेळगाव
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ऍन्ड हेल्थ स्टॅटेजिस यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथे ‘आरोग्य संवाद परिषद’ पार पडली. आरोग्य क्षेत्रात संशोधन करणारे संशोधक व माध्यमातून काम करणारे पत्रकार यांच्यामध्ये संवाद वाढवून संशोधनाचे परिणाम सामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे हा परिषदेचा हेतू होता.
या परिसंवादात नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल, आरोग्य संशोधन विभागाचे सचिव प्रा. बलराम भार्गव यांनी आरोग्याविषयी आणीबाणीच्या परिस्थितीत जनतेशी संवाद साधणे व त्यांचा विश्वास संपादन करणे महत्त्वाचे आहे. माध्यमांनी नेहमी आरोग्यविषयक बदल, संशोधन याबाबत माहिती देऊन जनतेला शिक्षित केले पाहिजे, असा सूर परिषदेत उमटला. यासाठी बोलक्मया बाहुल्या, चित्रपट, लघुपट यांचे माध्यम वापरणे आवश्यक आहे. परिषदेला बेळगावच्या आयसीएमआरचे वैद्यकीय संचालक डॉ. सुबर्णा रॉय, बेंगळूरच्या आयसीएमआरचे डॉ. प्रशांत माथुर, डॉ. बनप्पा कुणगेर, डॉ. रोली माथूर उपस्थित होते.