अहवालानंतर मोठय़ा कारवाईची तयारी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने 400 सनदी लेखापाल (सीए) अणि कंपनी सेक्रेटरींच्या विरोधात शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस केली आहे. सर्व महानगरांमध्ये नियमांचे उल्लंघन करून चिनी कंपन्यांना घोटाळय़ात मदत केल्याचा आरोप या सीए तसेच कंपनी सेक्रेटरींच्या विरोधात आहे. 2020 मध्ये गलवान येथील घटनेनंतर भारत सरकारने चीन तसेच चिनी कंपन्यांच्या विरोधात उचललेल्या पावलाचा हिस्सा आहे. गलवानमध्ये हिंसक झटापटीत 20 सैनिक हुतात्मा झाले होते.
नियम आणि कायद्याचे पालन न करता चिनी कंपन्या तसेच चीनकडून संचालित बनावट कंपन्यांना मदत करणाऱया सीए तसेच कंपनी सेक्रेटरींच्या विरात कारवाई सुरू करण्यात आली आहे. कंपनी व्यवहार मंत्रालयाने मागील दोन महिन्यांमध्ये आर्थिक गुप्तचर यंत्रणेकडून इनपूट प्राप्त केल्यावर कारवाईची शिफारस केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले आहे.