वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला इंदूर कसोटीत विश्र्रांती दिल्यानंतर 9 मार्चपासून अहमदाबाद येथे सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या अंतिम कसोटीसाठीच्या संघात स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने वैद्यकीय पथकाशी सल्लामसलत करून जे नियमितपणे ‘आयपीएल’ खेळणार आहेत आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठीच्या योजनेचा भाग आहेत अशा वेगवान गोलंदाजांना अधूनमधून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे पहिले दोन कसोटी सामने खेळलेल्या आणि एकदिवसीय संघाचा भाग असलेल्या शमीला तिसऱ्या सामन्यासाठी विश्र्रांती देण्यात आली. मोहम्मद सिराजसोबत त्याच्या जागी उमेश यादवला दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून निवडण्यात आले. सिराज तिन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळण्याची शक्मयता असल्याने मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरील अंतिम सामन्यात त्याला विश्रांती दिली जाण्याची शक्मयता आहे.
शमीने 30 हून अधिक षटकांमधून सात बळी मिळविलेले असून दोन्ही संघांमधील तो सर्वोत्तम वेगवान गोलंदाज ठरलेला आहे. रिव्हर्स स्विंगसाठी जी अनुकूल ठरू शकते अशा कोरड्या मोटेरा खेळपट्टीवर त्याची गरज भासणार आहे. दरम्यान, इंदूरमधील होळकर स्टेडियमवरील खेळपट्टी सामनाधिकाऱ्यांनी खराब ठरविल्यानंतर आता गुजरात क्रिकेट असोसिएशन आपली प्रतिष्ठा धोक्मयात येईल असे काहीही करण्याची शक्मयता नाही. ‘आम्हाला भारतीय संघ व्यवस्थापनाकडून कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत आणि आमचे स्थानिक क्मयुरेटर्स नेहमीप्रमाणे एक सामान्य खेळपट्टी तयार करत आहेत, जसे आम्ही नेहमीच केले आहे’, असे राज्य संघटनेच्या सूत्रांनी सांगितले आहे.