प्रतिनिधी / बेळगाव
राज्यात दारू विक्रीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. तरुण व्यसनाधीन बनत आहेत. तेव्हा राज्यातील सर्व दारू दुकाने बंद करावीत अशी मागणी मद्य विरोधी महिला संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी अनिता बेळगावकर, प्रभावती नरोटी, पद्मा बसरीकट्टी यांच्यासह इतर महिला उपस्थित होत्या.