‘गाळमुक्त धरण, जल युक्त शिवार’ योजनेचा केला शुभारंभ
कास वार्ताहर
मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी आपल्या मुळ गावी दरे येथे दाखल झाले असुन त्यांनी गावातच जनता दरबार भरवून आलेल्या नागरीकांच्या समस्यांचा निपटारा करत शेतीत रमत वक्षांची लागवड केली गाळमुक्त धरण जलयुक्त शिवार या योजनेचा शुभारंभ केला.
गावाला पोलीस छावणीचे स्वरूप
बुधवारी दुपारी अचानक मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मुळ गाव असणाऱ्या दरे तांब या मुळ गावी दाखल झाले त्यावेळी जिल्हाधीकारी जितेंद्र दुडी यांच्यासह जिल्हा प्रशासनाने त्यांच्या गावाकडे धाव घेतली यावेळी जिल्हाधीकारी जितेंद्र दुडी यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले आणि गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले.
गावातच भरवला जनता दरबार
जिल्हयासह राज्यभरातील नागरीकांना मुख्यमंत्री खाजगी दौर्या निमीत्त सातार्यातील आपल्या मुळ गावी आल्याचे समजताच राज्यभरातील हजारो नागरीकांनी मुंख्यमंत्र्याच्या दरे तांब या गावाकडे धाव घेतली चक्क कोयना नदीच्या उघड्या पडलेल्या पात्रातुन पायपीट करत विविध समस्यां घेऊन नागरीक आल्याने मुंख्यमंत्र्यानी जनता दरबार भरवून नागरीकांच्या समस्या जाणुन घेत संबधीत विभागांना त्या तात्काळ सोडवण्याचे आदेश दिले.
कितीही मोठे व्हा.. पण शेतीशी असलेली नाळ तोडु नका; मुंख्यमंत्र्याचा युवकांना संदेश
एकनाथ शिंदे यांना शेतीची पहिल्यापासुनच ओढ असुन ते वेळ मिळेल तेव्हा आपल्या गावी येऊन शेती करण्यावर भर देत असतात आता मुंख्यमंत्री असतानाही त्यांना शेतीची ओढ सुटत नसुन वेळात वेळ काढून ते आपल्या शेतीत रममान झाले त्यांनी केळी सोबत विविध वृक्षांची लागवड करत आपल्या शेतीत फेरफटका मारत शेतीचा आढावा घेत तुम्ही कितीही मोठे व्हा पण शेतीची ओढ सोडु नका असा संदेशच एक प्रकारे त्यांनी राज्यभरातील जनतेला दिला आहे उघड्या पडलेल्या कोयना नदीपात्रात फेरफटका मारत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
गाळमुक्त धरण जलयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ
कोयना जलाशयामध्ये गाळाची भर आधीक होऊ लागली असुन हि सुपीक गाळ युक्त माती शेतीला अधिक उपयुक्त असुन शेतकर्यांनी हा गाळ माती काढुन आपल्या शेतीत टाकल्यास पिकांना अधीक बळ मिळेल तर धरणातील गाळ माती कमी होऊन पाणी साठ्यात वाढ होईल त्या पाण्याचाही शेतकऱ्यांना लाभ होऊ शकतो त्यामुळे गाळमुक्त धरण जलयुक्त शिवार या योजनेचा कोयनेच्या नदीपात्रात मुंख्यमंत्र्याच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
कांदाटी खोऱ्यातील युवकांच्या रोजगारासाठी व्हिजन तयार करा
मुंख्यमंत्री यांनी जिल्हाप्रशासनाची बैठक घेऊन कांदाटी खोऱ्यासह या विभागातील युवकांना रोजगारासाठी शहराकडे जावे लागु नये यासाठी वनऔषधी पर्यटन बांबुलागवड मत्स्य व्यावसाय शेतीतील विविध प्रयोगांसाठी व्हिजन तयार करून आराखडा तयार करावा येथील रस्ते पुलांची कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सुचना बैठकीत देण्यात आल्या आहेत.
गावात मुंख्यमंत्र्यासमवेत पदाधिकारी, आधीकार्यांसह नागरीकांची मांदीयाळी
मुंख्यमंत्र्या सोबत विविध खात्यांचे सचिव, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी पोलिस प्रमुख समीर शेख आमदार महेश शिंदे यांच्यासह प्रशासनातील वरीष्ठ अधिकाऱ्यांसह हाजारो नागरीकांनी दरे या दुर्गम आणी छोट्याश्या गावामध्ये हजेरी लावल्याने गावाला वर्षा निवासस्थाना सारखे स्वरूप प्राप्त झाले असुन मुंख्यमंत्री रविवारी मुंबईकडे रवाना होणार असल्याचे सांगितले जात आहे