खानापूर : काँग्रेसच्या तालुक्यातील हाथ से हाथ जोडो आणि घरोघरी काँग्रेस या अभियानाला आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली असून तालुक्यातील प्रत्येक गावात हे अभियान राबविण्यात येत आहे. याची सुरुवात कणकुंबी माउली देवीला साकडे घालून नुकताच सुरू करण्यात आली. यानंतर बैलूर येथे सिद्धनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर हाथ से हाथ जोडो अभियानाला सुऊवात करण्यात आले. आमदार अंजली निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी घरोघरी जावून आमदार निंबाळकर यांनी तालुक्यात केलेल्या विकासकामांचे माहिती पत्रक देऊन काँग्रेसच्या राष्ट्रीय योगदानाबाबत माहिती देत आहेत. तसेच काँग्रेस पक्षाने केलेल्या विकासकामांचा आढावा सादर करत आहेत. तालुक्यात ग्राम पंचायत निहाय विकासकामाची पत्रके वितरित करण्यात येत असून या अभियानात कार्यकर्ते, पदाधिकारी व काँग्रेसचे नेते सक्रिय झाले आहेत. तसेच आमदार अंजली निंबाळकर या अभियानात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून भेटीगाठी घेत आहेत.
Previous Articleराज्यात भाजप निश्चित सत्तेत येणार
Next Article संयुक्त संसदीय समिती स्थापन करा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.