प्रयाग चिखली वार्ताहर
देशातील बंधुभाव कमी करून आरएसएसच्या विचारधारेतून प्रेरणा घेणाऱ्या भाजपाने देशाला अधोगतीला नेण्याचे काम केले. आहे. सर्वाधिक बेरोजगारी आणि महागाईमुळे अर्थव्यवस्थेचे वाटोळे लावणाऱ्या मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षात कराच्या नावाखाली लोकांच्या खिशातील तीस लाख कोटी लाटले असून निव्वळ भावनिक वातावरण निर्माण करून सत्ता हस्तगत करण्याचा डाव हाणून पाडत मोदी सरकारला घरी पाठवा आणि लोकशाही वाचवा असे आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी करवीर तालुक्यातील वडणगे येथील जनसंवाद सभेमध्ये बोलताना केले.
गेले काही दिवसांपासून कोल्हापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने चालू असलेल्या भारत जोडोच्या धरतीवर जनसंवाद पदयात्रा चालू होती या पदयात्रेत चा समारोप आज वडणगे येथील जनसंवाद सभेने झाला. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य बीएच पाटील हे होते.
या जनसंवाद सभेत पुढे बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले सध्या केंद्रात असलेले मोदी सरकार म्हणजे आर एस एस चे पॅटर्न डिझाईन होय. त्यांची पावले हुकूमशाहीच्या दृष्टीने पडत आहेत देशाला ऐतिहासिक कर्जाच्या खाईत लोटणारे भाजप सरकार आहे. विकासाच्या नावाखाली अनेक सरकारी कंपन्या बँका विमानतळ बंदरे विकण्याचा सपाटा मोदी सरकारने लावला असून निवडणूक आयोग ही खिशात घातला आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत निव्वळ फसवणूक करू पाहणाऱ्या या सरकारला मराठ्यांची मते मागण्याचा नैतिक अधिकार नसल्याचेही ते म्हणाले.
यावेळी जनसंवाद पदयात्रेबद्दल आमदार सतेज पाटील म्हणाले आपण सुरू केलेल्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने सध्याच्या गढूळ राजकीय वातावरणात कोणावर विश्वास ठेवावा? याबाबत जनतेच्या मनामध्ये संभ्रम असून पुन्हा एकदा काँग्रेस पक्षच आपल्याला न्याय देऊ शकेल असा विश्वास लोकांना वाटत असल्याचे दिसून आले. त्यामुळे चंदगड पासून करवीर पर्यंतच्या सर्व जनतेने जनसंवाद यात्रेसाठी भरभरून प्रतिसाद दिला. गेल्या नऊ वर्षात भाजप सरकारने शेतकऱ्यांना नव्हे तर उद्योगपतींना बारा लाख कोटी रुपये माफ केले आहेत. त्यामुळे हे शेतकऱ्यांचे नव्हे तर उद्योगपतींचे सरकार असल्याचे सिद्ध झाले आहे. द्वेषाचे राजकारण करून दिशाभूल करत महापुरुषांचा इतिहास पुसण्याचे काम भाजप सरकारकडून चालू आहे फेसबुक व्हाट्सअप आणि युट्युब चा गैरफायदा घेत निवडणुका जिंकणाऱ्या मोदी सरकारला दक्ष राहून रोखणे काळाची गरज असल्याचे सांगून मराठ्यांना कायदा करून आरक्षण देणार काय असा प्रश्नही सरकारला त्यांनी केला आपल्या भाषणावेळी केला.
यावेळी करवीरचे आमदार पी एन पाटील यांनी जातीय दंगली घडणारा भाजप पक्ष असल्याचा आरोप करत सामान्यांना तसेच तरुणांना भडकावून देश संपवायचं काम मोदी सरकार करत असल्याचे सांगितले तसेच सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी आणि आधारासाठी जनसंवाद पदयात्रा असून लोकांनी काँग्रेसचा पर्याय स्वीकारावा असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी वडणगेचे बीएच पाटील यांनी आपण आयुष्यभर काँग्रेसच्या विचारधारेशी सहमत असून सर्वांनी काँग्रेसची विचारधारा अंगीकारून पक्षाच्या सकारात्मक विचाराच्या महायज्ञात सहभागी व्हावे असे आवाहन केले यावेळी मार्केट कमिटीचे चेअरमन भारत भुयेकर तसेच वरणगेचे शंकरराव पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
प्रास्ताविक वडणगेचे रवींद्र (बीएच) पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन अमित पाटील यांनी केले.
यावेळी गणेश उत्सव काळात रात्री बारा वाजेपर्यंत डॉल्बी लावण्यासाठी परवानगी मिळावे यासाठी प्रयत्न करावेत अशा आशयाचे निवेदन येथील बीएच पाटील युवा मंचच्या वतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आले.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील सुरेश कुराडे बाजीराव खाडे गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले बाळासाहेब खाडे सत्यजित पाटील शिवाजी कवठेकर वडणगे चे माजी सरपंच- सचिन चौगले डॉ सुनील पाटील डॉ. एम बी किडगावकर पै. संभाजीराव पाटील हंबीरराव वळके वडणगेचे- बी आर पाटील विठ्ठल माने एमजी पाटील (आंबेवाडी) चिखलीचे सरपंच- रोहित पाटील, प्रभाकर पाटील, केवलसिंग रजपूत, धनाजी चौगले व इतर मान्यवर उपस्थित होते.
घटना दुरुस्ती करा आणि आरक्षण द्या…
यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठ्यांना आरक्षण द्यायचेच असेल तर सरकारने घटना दुरुस्ती करून कायदा करून आरक्षण द्यावे जेणेकरून मराठ्यांना न्याय मिळेल.
नातू कुणाबरोबर बघा?
यावेळी सतेज पाटील म्हणाले जुनी जाणती माणसं काँग्रेस बरोबर राहतात मात्र त्यांनी त्यांचा नातू कुठे आहे काय करतो यावर लक्ष ठेवून त्याला काँग्रेसच्या प्रवाहात आणा असे आवाहनही केले