काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नव्याने बांधलेल्या संसद भवनाचे उद्धाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi ) यांच्याहस्ते होण्याला विरोध केला आहे. नविन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते न करता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हायला हवे असे त्यांनी म्हटले आहे. 28 मे रोजी पंतप्रधानांच्या हस्ते मोदी या संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत.
हेही वाचा >>> काही लोक जातीजातीमध्ये तेढ निर्माण करत आहेत; पण देशाचे चित्र बदलत आहे- शरद पवार
या आठवड्याच्या सुरुवातीला काँग्रेस नेते आणि खासदार जयराम रमेश नव्याने बांधलेली संसद भवनची इमारत हा पंतप्रधान मोदींचा ‘वैयक्तिक वैनिटी प्रोजेक्ट’ आहे अशी टिका केली. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदभवनाची पाहणी करत असल्याचे दिसून येत आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी “28 मे रोजी उद्घाटन करणार्या नवीन संसदेच्या इमारतीचे एकमेव वास्तुविशारद, डिझायनर आणि कारागीर. हा फोटो सर्वकाही सांगते ही हा त्यांचा वैयक्तिक व्हॅनिटी प्रकल्प आहे.” असा उपरोधात्मक टोला हाणला आहे.
त्यानंतर आता राहूल गांधी यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले “राष्ट्रपतींनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करावे, पंतप्रधानांनी नव्हे,” असे राहुल गांधी यांनी हिंदीत ट्विट केले आहे.