बेळगाव : साडेतीन मुहुर्तापैकी एक समजली जाणारी अक्षय्य तृतिया शुक्रवारी असल्याने बाजारात गुरुवारी खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढली होती. विशेषत: सोने-चांदी बरोबरच नवीन वस्तुंनाही पसंती दिली. अक्षय्य तृतिया हा सोने खरेदीला उत्तम दिवस मानला जात असल्याने सराफी दुकानांमध्ये गर्दी वाढली होती. अक्षय्य तृतियाच्या शुभमुहुर्तावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामुळे बाजारात विविध फळांनाही मागणी वाढली होती. विशेषत: गणपत गल्ली, समादेवी गल्ली, कडोलकर गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, काकतीवेस रोड, शहापूर, वडगाव आदी भागांमध्ये नागरिकांची रेलचेल पहावयास मिळाली. लग्नसराई व यात्रा-जत्रांमुळे बाजारपेठेला बहर येवू लागला आहे. त्यातच अक्षय्य तृतियाच्या शुभमुहुर्तावर सोने-चांदी, चेन, ब्रेसलेट, अंगठी, नेकलेस, विविध हार, मंगळसूत्र, चांदीचे ताट, तांब्या, देवीच्या मूर्ती, समई याबरोबरच इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रीक वस्तुंची खरेदीही केली जाणार आहे. नवीन वाहने खरेदीवरही भर दिला जाणार आहे. शुक्रवारी विविध वस्तू खरेदीतून बाजारात उलाढालही वाढणार आहे. त्यामुळे विविध शोरूम्समध्येदेखील नागरिकांची गर्दी पहावयास मिळणार आहे.
Previous Articleचिरंजीवी, वैजयंती माला पद्मविभूषणने सन्मानित
Next Article आंबा महोत्सवाला आजपासून प्रारंभ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.