हलगा-मच्छे बायपास रस्त्यामुळे पाणी साचून : शेकडो एकर जमिनीतील पिकाला बसणार फटका
प्रतिनिधी / बेळगाव
मान्सूनला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता बळ्ळारी नाल्याला पूर येण्यास सुरुवात होत आहे. यातच हलगा-मच्छे बायपास रस्ता सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. या रस्त्यासाठी माती टाकण्यात आली आहे. त्यामुळे आणखीनच गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून या रस्त्यामुळे शेकडो एकर जमिनीला पुराचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
बळ्ळारी नाला हा दरवर्षीच शेतकऱयांना शाप ठरत आहे. नाला परिसरातील शेकडो एकर जमिनीतील भातपीक वाया जात आहे. दरवषीच शेतकऱयांना हा फटका बसत आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱयांनी विरोध केला आहे. तरीदेखील हा रस्ता करण्यासाठी दडपशाही केली जात आहे. मध्यंतरी न्यायालयाचा अवमान करत हा रस्ता करण्यासाठी माती टाकली आहे. त्यामुळे आता या रस्ता परिसरातील शिवारामध्ये पाणी साचू लागले आहे.
पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास शेकडो एकर जमिनीला फटका बसणार आहे. यामुळे शेतकऱयांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पावसाला सुरुवात झाली तरी म्हणावा तसा अजून जोर नाही. त्यामुळे सध्या पाण्याचा निचरा होत नाही. मात्र पावसाचा जोर वाढला तर आणखी पाणी साचून राहणार आहे. त्यामुळे शेतकऱयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पुराचा धोका..
- हलगा-मच्छे बायपाससाठी माती टाकल्याने समस्या
- बळ्ळारी नाला हा दरवर्षीच शेतकऱयांना शापित
- पीक नुकसानीच्या संकटामुळे शेतकऱयांमध्ये भीतीचे वातावरण