धरण क्षेत्रातील पाणीसाठी कमी होत असल्याने महापालिकेचा निर्णय
कोल्हापूर प्रतिनिधी
महापालिकेकडून उद्या शनिवारपासून निम्म्या शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. बालिंगा योजनेवर अवलंबून असणाऱ्या बी, सी, डी व ई वॉर्डमधील भागांचा यामध्ये समावेश आहे. धरणक्षेत्रामधील पाणी साठा कमी होत असल्याने नदी पात्रामध्ये पाण्याची पातळी कमी होत असल्याने महापालिकेना हा निर्णय घेतला आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. यामध्येच धरणक्षेत्रामधील पाणी साठा कमी होत असल्याने नदीपात्रामध्ये पाण्याची पाण्याची पातळी कमी होत आहे. भविष्यातील पाणी टंचाई विचारात घेता वर्षभर शहराला पुरेसा पाणी पुरवठा व्हावा. तसेच योग्य दाबाने पाणी मिळावे, यासाठी महापालिकेने पाणी टंचाई परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत निम्म्या शहरात दिवासआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. या भागातील नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मनपा पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
शनिवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा होणार परिसर
आझाद गल्ली, मटन मार्केट, लक्ष्मीपुरी परिसर, शाहूपुरी 5, 6, 7, व 8 वी गल्ली, कामगार चाळ, सुभाषरोड, चांदणी चौक, रविवार पेठ, सुतार वाडा, खानविलकर पेट्रोल पंप, अकबर मोहल्ला, साळी गल्ली, महाराणा प्रताप चौक, शाहूपुरी कुंभार गल्ली, बाराइमाम परिसर, भवानी मंडप परिसर, सब जेल परिसर, मिरजकर तिकटी, महालक्ष्मी नगर, टेंबे रोड, सावित्रीबाई फुले दवाखाना परिसर
रविवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा होणारा परिसर
महाद्वाररोड, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, ब्रम्हेश्वर बाग, तटाकडील तालीम, चंद्रेश्वर, संध्यामठ, फुलेवाडी, रंकाळा टॉवर, शिवाजी पेठ काही भाग, गुजरी, दत्त गल्ली, लक्ष्मी गल्ली, गंगावेश, दुधाळी, पंचगंगा रोड, लोणार चौक, पापाची तिकटी, बुरुड गल्ली, सोन्या मारुती चौक, शिपुगडे तालीम, पिवळा वाडा, डोरले कॉर्नर, सिद्धार्थनगर, ब्रह्मपुरी, उत्तरेश्वर, लक्षतीर्थ वसाहत, बलराम कॉलनी