वृत्तसंस्था / पाटणा
आपण पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत समाविष्ट होणार आहोत, या वृत्ताचा नितीशकुमार यांनी इन्कार केला आहे. आमचा संयुक्त जनता दल पक्ष आता पुन्हा रालोआत समाविष्ट होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना येथील एका कार्यक्रमानंतर सोमवारी स्पष्ट केले.
आपल्याला पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा नाही. माझा प्रयत्न केवळ विरोधी पक्षांची आघाडी अधिकाधिक बळकट व्हावी या दृष्टीने प्रयत्न करण्याचा आहे. आपल्या पक्षाच्या सदस्यांनीं आपल्या पंतप्रधानपदासंबंधी कोणतेही भाष्य करु नये, असे आपण त्यांच्यासमोर स्पष्ट केले आहे. कोणता नेता पंतप्रधान होतो त्यापेक्षा आघाडी मजबूत होणे अधिक आवश्यक आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.