जर्मनीच्या चान्सलर्ससोबत पंतप्रधान मोदींची चर्चा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दोन दिवसांच्या भारत दौऱयावर आलेले जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्झ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण युरोपमध्ये जर्मनी हा आमचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असून गुंतवणुकीचा महत्त्वाचा स्रोत असल्याचेही स्पष्ट केले. भारत आणि जर्मनी यांच्यातील मजबूत संबंध परस्पर हिताच्या सामायिक लोकशाही मूल्यांवर आधारित आहेत. भारत आणि जर्मनीमध्ये दहशतवाद आणि फुटीरतावादाच्या विरोधात सक्रिय सहकार्य आहे. सीमेपलीकडील दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी ठोस कृती आवश्यक असल्यावरही दोन्ही देश सहमत असल्याचा निर्वाळा द्वयींमधील चर्चेअंती देण्यात आला. जर्मन चान्सलर झाल्यानंतर ओलाफ शोल्झ यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्यांच्यासोबत वरि÷ अधिकारी आणि व्यापारी शिष्टमंडळ आहे.
जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्झ दोन दिवसांच्या भारत दौऱयावर दाखल झाले आहेत. दौऱयाच्या पहिल्याच दिवशी शोल्झ यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे मुद्देही उपस्थित करण्यात आले. रशिया-युपेन युद्धाच्या सुरुवातीपासून आम्ही शांततेबद्दल बोलत आहोत. हा प्रश्न चर्चेने सोडवावा, असे आम्ही म्हटले आहे. भारत कोणत्याही शांतता प्रक्रियेत योगदान देण्यास तयार आहे. त्याचप्रमाणे सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य हे भारत-जर्मन धोरणात्मक भागीदारीचे महत्त्वाचे स्तंभ बनू शकतात. या क्षेत्रातील आमची क्षमता पूर्णतः ओळखण्यासाठी एकत्र काम सुरू ठेवण्याची हमी यावेळी देण्यात आली.
दोन्ही देशांमध्ये सखोल समज
त्रिकोणीय विकास सहकार्याअंतर्गत भारत आणि जर्मनी तिसऱया जगाच्या विकासासाठी परस्पर सहकार्य वाढवत आहेत. गेल्या काही वर्षांत द्विपक्षीय संबंधही घट्ट झाले आहेत. गेल्या वषी माझ्या जर्मनी भेटीदरम्यान, आम्ही हरित आणि शाश्वत विकास भागिदारीची घोषणा केली. याद्वारे, आम्ही हवामान कृती आणि शाश्वत विकास उद्दिष्टे या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवत आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पाणबुडय़ांसंबंधी करार
पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चेनंतर जर्मनीचे चान्सलर शोल्झ यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही देशांदरम्यान 6 पारंपारिक पाणबुडय़ा संयुक्तपणे बांधण्यासाठी 5.2 बिलियन डॉलर्सचा करार करण्यात आला. शोल्झ यांचे राष्ट्रपती भवनात दिमाखदार पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी त्यांनी भारत आणि जर्मनी यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
‘आयजीसी’वर चर्चा
2011 मध्ये दोन्ही देशांदरम्यान आंतर-सरकारी सल्लामसलत (आयजीसी) सुरू झाली. या भेटीदरम्यान ‘आयजीसी’च्या पुढील बैठकीसंबंधीही चर्चा केली. तसेच या भेटीमुळे भारत आणि जर्मनी यांच्यातील संरक्षण सहकार्य आणखी मजबूत होईल. याशिवाय विज्ञान-तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रातही दोन्ही देश आपले संबंध दृढ करू शकतील, असे सांगितले.