मुख्यंमत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालावे : कामगार संघटनेची मागणी : वार्षिक सर्वसाधारण सभेत कामगार कपातीचा मुद्दा गाजला
प्रतिनिधी /वाळपई
सेसा गोवा खाण कंपनीच्या एकूण 443 कामगारांना 5 ऑक्टोबरपासून घरी पाठविण्यात येणार आहे. यामुळे कामगारांमध्ये खळबळ निर्माण झालेली आहे .मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खनिज खाणीचा व्यवसाय तीन महिन्यांत सुरू होणार असल्याची घोषणा केलेली आहे. यामुळे कंपनीने या कामगारांना कमी करू नये यामध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व गोव्याच्या इतर आमदारांनी यामध्ये गांभीर्याने यांनी लक्ष घालून या कामगारांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी सेसा गोवा कामगार संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतून करण्यात आली.
सेसा गोवा कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच सांखळी येथील रवींद्र भवनामध्ये पार पडली. या सभेत 5 ऑक्टोबरपासून कामगारांना वगळण्यात येण्याचा मुद्दा प्रामुख्याने गाजला.
यावेळी अनेकांनी पोटतिडकीने विषय मांडून सरकारने कंपनीवर दबाव घालावा व या कामगार कुटुंबांना सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर सेसा गोवा कामगार संघटनेचे अध्यक्ष देवानंद परब, सचिव रमेश सिनारी, कामगार संघटनेचे पदाधिकारी अनंत गांवस, अमेय नाईक, विशाल नाईक, सत्यजित चौरसकर, लॉरेन्स ब्रागांझा, प्रसाद गावस, प्रेमानंद सावंत यांची उपस्थिती होती.
संघटनेचे अध्यक्ष देवानंद परब यांनी सांगितले की 5 ऑक्टोबर पासून कंपनीच्या एकूण 443 जणांना घरी पाठविण्यात येणार आहे. या संदर्भाची नोटीस कंपनीने यापूर्वी दिलेली आहे. यामुळे या कामगार बांधवांच्या कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व राज्यातील इतर आमदारांनी या कामगारांच्या एकूण उदरनिर्वाहाबाबत गांभीर्याने कंपनीने न वगळण्याची ग्वाही द्यावी, अशी मागणी केली. खनिज खाणींचे काम बंद असतानाही कंपनीने आम्हाला चांगले सहकार्य केले आहे. यामुळे येणाऱया काळात खनिज खाणीचा व्यवसाय पुन्हा सुरू होणार असल्यामुळे कंपनीने या कुटुंबाच्या कामगार बांधवांचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.
कंपनीशी आजही चांगले संबंध
जवळपास बारा वर्षापासून खनिज खाणींचे काम पूर्णपणे बंद आहे असे असताना सुद्धा कंपनीच्या व्यवस्थापनाने कामगारांना चांगल्या प्रकारची वागणूक व सेवा दिलेली आहे. यामुळे कंपनीचे व आमचे संबंध चांगले आहेत. मात्र कंपनीने आता या कुटुंबाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कंपनीच्या कामगारांना वगळू नये, अशी विनंती कंपनीच्या कामगार संघटनेचे सचिव रमेश सिनारी यांनी केले आहे.
कॉन्ट्रक्टरच्या जागी आम्हाला सामावून घ्यावे
कंपनीच्या अनेक ठिकाणी कंपनीने कॉन्ट्रक्टरची नियुक्ती केलेली आहे. अजूनही सदर ठिकाणी कामगारांची गरज आहे. यामुळे कंपनीने या कामगारांना सदर ठिकाणी सामावून घ्यावे व त्यांचा उदरनिर्वाह वाचवावा अशा प्रकारची मागणी केली. त्याला कामगार बांधवांनी भरभरून प्रतिसाद दिला, असे रमेश सिनारी यांनी सांगितले
चांगले लाभाची स्वेच्छा निवृत्ती योजना बनवावी!
वगळण्यात येणाऱया कामगारांना अनेक स्तरावर समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. यामुळे ज्या कामगारांना आता इतर राज्यात काम करणे शक्मय नाही. त्यांच्यासाठी कंपनीने चांगल लाभ देऊन स्वेच्छा निवृत्ती योजना तयार करावी. तसे केल्यास अनेक कामगार या योजनेचा फायदा घेऊन घरी जाणार आहेत. मात्र घरी जाताना त्यांच्यासाठी समाधानकारक पुंजी निर्माण करणे गरजेचे असल्याचे यावेळी रमेश सिनारे यांनी स्पष्ट केले.
सहकारी कामगार बांधवांसाठी शेवटपर्यंत लढा देण्याची तयारी असल्याचे अनंत गावस, निरज गावस, .प्रसाद गावस यांनी सांगितले. सुरज गावस यांनी सूत्रसंचालन केले