प्रतिनिधी,विटा
Sangli News : उदगिरी साखर कारखाना दररोज 5 हजार मे. टनाने ऊस गाळप करणार आहे. इथेनॉल करिता असलेली मागणी विचारात घेता इथेनॉल प्रकल्पाची क्षमता 1 लाख 70 हजार लिटर्स करणेत आली आहे. पाण्याचा पुनर्वापर करून बचत होणार आहे. भागातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कारखाना विस्तारित केला आहे,असे प्रतिपादन चेअरमन डॉ.राहुल कदम यांनी केले.
येथील उदगिरी साखर कारखान्याच्या आकराव्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदिपन समारंभ कारखान्याचे मार्गदर्शक माजी आमदार आणि सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन वनश्री मोहनराव कदम यांच्या शुभहस्ते पार पडला.यावेळी संस्थापक डॉ.शिवाजीराव कदम उपस्थित होते.श्री सत्यनाराण पुजा कारखान्याचे चेअरमन डॉ.राहुल शिवाजीराव कदम आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. देवयानी कदम यांचे हस्ते करण्यात आली.
कारखान्याचे चेअरमन राहुल कदम म्हणाले, कारखाना दररोज 5 हजार मे.टनाने ऊस गाळप करणार आहे.इथेनॉल करिता असलेली मागणी विचारात घेता इथेनॉल प्रकल्पाची क्षमता 1 लाख 70 हजार लिटर्स करणेत आली आहे.त्याचे उभारणीचे काम अंतीम टप्प्यात असून ऑफ सिझनमध्ये डिस्टिलरी जादा दिवस चालविणेत येणार असल्याचे सांगीतले.त्याचप्रमाणे ऊस गाळीत केल्या नंतर रसातील पाणी बाजूला काढून त्याचे पुनर्वापर करणेत येणार आहे. यामुळे दैनंदिन पाणी वापर कमी होणार असल्याचे चेअरमन कदम म्हणाले.
संस्थापक डॉ शिवाजीराव कदम म्हणाले, येणाऱ्या गळीत हंगामामध्ये जास्तीत जास्त ऊस उदगिरी कारखान्यास देणाऱ्या पहिल्या पाच शेतकऱ्यांना अनुक्रमे 51 हजार, 40 हजार, 30 हजार, 20 हजार व 10 हजार असे बक्षीस देवून जाहीर सत्कार करणार असल्याचे कदम म्हणाले.कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी करणेसाठी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस उदगिरी कारखान्यास गळीतासाठी पाठवावे,असे आवाहन डॉ. शिवाजीराव कदम यांनी केले. कारखान्याचे पूर्णवेळ संचालक उत्तम पाटील म्हणाले,कारखाना सहवीज निर्मिती व आसवणी प्रकल्पाची ऑफ सिझनमधील कामे पूर्ण झाली आहेत.ऊस तोडणी आणि वाहतुकी करिता पुरेशी यंत्रणाही भरली असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी डॉ. हणमंतराव कदम, विजय कदम, अँड सुशांत कदम,सोनहिरा कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन निवृत्ती दाजी जगदाळे,संचालक सयाजी धनवडे,कराडचे आबासाहेब चव्हाण, तडसरचे दिलीपराव पाटील,वांगीचे बाबा सूर्यवंशी,पैलवान दादा सुर्यवंशी, दुधोंडीचे जे.के.बापू जाधव, खेराडे विटाचे आ.एम.पाटीलसर आनंदाराव साळुंखे,मंगरुळचे आनंदराव पाटील,बामणीचे अभिजित शिंदे,भरत लगरे,महाविर शिंदे,बाजीरावनाना शिंदे,विटाचे सुरेश पाटील,शरद शहा यांचेसह कडेगांव, पलूस व खानापूर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी,शेतकरी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार कारखान्याचे संचालक प्रल्हाद पाटील यांनी मानले तर सुत्र संचालन प्रशासकीय अधिकारी बशीर संदे यांनी कैले.