ऑनलाईन टीम/ तरुण भारत
ED Raids On Vivo : देशात ईडीच्या कारवाईची भिती बसली आहे. राजकीय नेत्यानंतर आता ईडीची नजर मोबाईल कंपनीवर पडली आहे. विशेषत: भारतीय बाजारपेठेत वर्चस्व गाजवणाऱ्या चीनवर मनी लाँड्रिंगची चौकशी सुरु आहे. गेल्या पाच महिन्यापूर्वी Xiaomi, Huawei आणि आता Vivo वर ईडीची करडी नजर आहे. दोन दिवसापूर्वी ईडीने विवो आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात 44 ठिकाणी छापे टाकले होते. छापे टाकल्यानंतर कंपनीचे संचालक झेंगशेन ओऊ आणि झांग जी देश सोडून पळून गेले आहेत.
काय आरोप आहे.
चिनी मोबाईल कंपन्यांवर रॉयल्टी आणि करचुकवेगिरीच्या नावाखाली देशाबाहेर पैसे पाठवल्याचा आरोप आहे. ईडीने अलीकडेच विवोविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान देशभरातील 44 ठिकाणी छापे टाकले आहेत.एप्रिलमध्ये, विवोच्या मालकी आणि आर्थिक अहवालांमध्ये तफावत आहे का हे पाहण्यासाठी चौकशी करण्यात आली होती. ईडी, सीबीआयसोबतच कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयही या कंपन्यांशी संबंधित कंपन्यांवर बारीक नजर ठेवून आहे. यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात की, भारत देश कायदा आणि नियमांनुसार Vivo ची चौकशी करेल.आम्ही या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत असेही ते म्हणाले.
हेही वाचा- ठाण्यात उध्दव ठाकरेंना धक्का; 66 नगरसेवक शिंदे गटात
चीनच्या या कंपन्यांवरही कारवाई
1) Xiaomi
ईडीने एप्रिलमध्ये फेमा उल्लंघनाच्या आरोपाखाली चीनी मोबाइल कंपनी Xiaomi ची 5,551 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.
2) Huawei
प्राप्तिकर विभागाने फेब्रुवारीमध्ये Huawei च्या कार्यालयांवरही छापे टाकले होते. तपास यंत्रणेची ही झडती दिल्ली, हरियाणा, गुरुग्राम आणि बंगळुरू येथील कार्यालयात घेण्यात आली. करचोरी प्रकरणातील काही कागदपत्रेही अधिकाऱ्यांनी जप्त केली होती.