हिमाचलमधील मृतांचा आकडा 25 च्या वर ः झारखंडमध्ये 7 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उत्तर भारतातील आठ राज्यांना पावसाचा फटका बसला आहे. पश्चिमी वाऱयांमधील बदलामुळे मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशमध्ये गेल्या चोवीस तासात संततधार पाऊस कोसळत आहे. तसेच हिमाचल प्रदेश, झारखंड आणि उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे मोठी जीवितहानी झाली आहे. बऱयाच ठिकाणी महापूर आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर मैदानी भागात नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. उत्तराखंडमधील पुरात अडकलेल्या पर्यटकांसाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
मध्यप्रदेशात मुसळधार पावसामुळे तवा आणि बरगी धरणाचे दरवाजे मध्यरात्री उघडावे लागले. त्याचबरोबर पुढील 24 तास पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, सोमवारनंतर पावसाने दिलासा मिळू शकेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. हिमाचलमध्ये पूर, भूस्खलन आणि ढगफुटीच्या 34 घटनांमध्ये मृतांची संख्या 26 झाली आहे, तर 6 जण अजूनही बेपत्ता आहेत. कांगडा, मंडी आणि चंबा जिह्यात निसर्गाच्या कहराने सर्वाधिक हाहाकार माजवला. मंडीमध्ये 14, चंबाच्या भाटीयात 3 आणि कांगडा आणि शिमला जिह्यात प्रत्येकी 2 जणांचा मृत्यू झाला. कांगडा येथील शाहपूर येथे घर कोसळल्याने आपला जीव गमावलेल्या 9 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.
मध्यप्रदेशात दमदार पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. राजधानी भोपाळ, नर्मदापुरम, विदिशा, छिंदवाडा आणि रायसेनसह राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. तवा धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्याने रात्री 11 वाजल्यापासून 5 दरवाजे उघडण्यात आले. त्याचबरोबर नर्मदेवर बांधण्यात आलेल्या बरगी धरणाचे 11 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत.
झारखंडमध्ये पश्चिम सिंगभूम, सरायकेला-खरसावन आणि पूर्व सिंगभूम जिह्यांसह कोल्हानमधील अनेक नद्यांच्या पाण्याची पातळी धोक्मयाच्या चिन्हावर पोहोचली आहे. राज्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. सखल भागात पूर आला असून झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. सिंहभूममध्ये एका महिलेचा आणि रामगडमध्ये दोघांचा बुडून मृत्यू झाला, तर काही लोक बेपत्ता आहेत. नळकरी नदीत कार बुडून चार जणांचा मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशातील 42 जिह्यांमध्ये कहर
उत्तर प्रदेशात मान्सून सक्रिय अवस्थेत आहे. हवामान खात्याने येत्या 23 ऑगस्टच्या अंदाजापेक्षा तिप्पट पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विभागाने रविवारी 42 जिह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला. त्यापैकी 26 जिह्यांमध्ये यलो अलर्ट आणि 16 जिह्यांमध्ये रेड अलर्ट आहे. रेड अलर्ट जिह्यांमध्ये 70 किमी ताशी आणि यलो अलर्ट जिह्यांमध्ये 40 किमी ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्मयता आहे. परिणामी, पावसाचा जोरही वाढणार आहे.
उत्तर प्रदेशातील बहुतांश भागात शनिवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. लखनौ आणि कानपूरमध्ये बरसलेल्या दमदार पावसामुळे कानपूरमधील मोती झील, विजय नगर, शास्त्री नगरसह अनेक भाग जलमय झाले होते. येथे गेल्या 24 तासात सरासरी 12.4 मिमी पाऊस पडला. रविवारी सकाळपासून लखनौ, कानपूर, अयोध्या, आग्रा येथे जोरदार थंड वारे वाहत होते. हवामान खात्याने येथेही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.