Eknath Shinde News : गेली दोन दिवस महाराष्ट्रात जवळपास सर्वच ठिकाणी पाऊस झाला आहे. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. दरम्यान, मुंबईत मात्र पहिल्याच पावसाने गटारं तुंबून सर्वत्र पाणी साचलं. याबाबत पत्रकारांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र शिंदे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की,पाणी साचलं याची तक्रार का करता, पाऊस झाला याचं स्वागत करा.पाऊस झाला त्यावर बोलत नाहीत. पाऊस झाल्याने सर्वांनाच मनापासून आनंद झाला आहे.अरे बाबा, पाऊस झालं याचं स्वागत करा. गेले अनेक दिवस आपण पावसाची आतुरतेने वाटत पाहत होतो.आता पाऊस पडतोय तर बळीराजा आणि आपण सगळे त्याचं आनंदाने स्वागत करुयात.असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.
एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वरळी येथील कोस्टल रोड येथे हजर राहून पाणी साचण्याची कारणे जाणून घेतयेथील परिस्थितीचा आढावा घेतला. या भागात पाणी साचू नये याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.काल मुंबईत झालेल्या पहिल्याच पावसामुळे इथे पाणी साचून हा परिसर जलमय झाल्यामुळे येथे अनेक वाहने अडकून पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती.