वाकरे,प्रतिनिधी
करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात कुंभी कासारी परिसरात अनेक गावात नदीमध्ये गणेश मूर्ती आणि गौरीच्या निर्माल्याचे विसर्जन न करता नदीकिनारी ठेवलेल्या कुंड्यांमध्ये गणेश आणि गौरी निर्माल्य विसर्जन करून पर्यावरण पूरक गणेश व गौरी विसर्जन करण्यात आले.त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषण रोखण्यास काही प्रमाणात हातभार लागला.
करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात वाकरे,कुडित्रे,कोपार्डे,खुपिरे ,शिंदेवाडी,साबळेवाडी,बालिंगा,कळंबे,भामटे,चिंचवडे इत्यादी गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या वतीने नदीमध्ये गणपती आणि गौरी निर्माल्य विसर्जन न करता नदी तीरावरील कुंडांमध्ये विसर्जन करावे असे आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला आणि पर्यावरण पूरक गणेश विसर्जन केले.
नदी पाणी प्रदूषण रोखण्यासाठी या पर्यावरण पूरक विसर्जनाचा फायदा होणार आहे.त्याचबरोबर निर्माल्य नदीत न टाकता दान केल्याने नदीच्या पाण्याचे होणारे प्रदूषण थांबले आहे.ग्रामस्थांमध्ये पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करण्यास जनजागृती झाली असून, पाण्याचे प्रदूषण टाळण्याची गरज सर्वांना जाणवू लागली आहे.त्यामुळे विसर्जनाला विधायक वळण लागण्याची शक्यता आहे.