वृत्तसंस्था /नवी दिल्ली
गेल्या काही दिवसांपूर्वी झालेला वाद मागे टाकून भारताने मालदीवला मदतीचा हात पुढे केला आहे. भारत मालदिवला आता तांदूळ, गहू, साखर आणि कांद्याची निर्यात करणार आहे. मालदीव सरकारने भारत सरकारकडे जीवनावश्यक वस्तू पाठवण्याची विनंती केल्यानुसार भारताने मालदीवला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भारत मालदीवला जीवनावश्यक वस्तूंची निर्यात करणार आहे. यामध्ये गहू, तांदूळ, कांदा, साखर या वस्तूंचा समावेश आहे. या माध्यमातून भारत-मालदीव यांच्यातील व्यापार वाढणार आहे. तसेच या व्यापारातून मोठी उलाढाल होणार आहे. भारत हा साखर, तांदूळ आणि कांद्याचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. दरवषी मोठ्या प्रमाणात देशातून या वस्तूंची परदेशात निर्यात केली जाते. अनेक शेजारील देश भारतावर अवलंबून आहेत. याचदरम्यान मालदीवने भारताला जीवनावश्यक वस्तूंची निर्यात करण्याची विनंती केली होती. त्यानुसार भारताने मालदीवला जीवनावश्यक वस्तू निर्यात करण्याचा निर्णय घेण्यासंबंधी करार केला आहे. या कराराची पूर्तता करताना देशांतर्गत बाजारात कोणत्याही वस्तूंच्या दरात वाढ होऊ नये याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताकडून मालदीवला मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाणार आहे.