प्रतिनिधी/बेंगळूर: वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा बेळगाव पर्यंत विस्तार करण्याचे निवेदन कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.
या संदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले आहे. बेंगळूर ते हुबळी-धारवाड पर्यंत असलेल्या वंदे भारत रेल्वे सेवा पुढे बेळगाव पर्यंत विस्तार करण्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आले आहे. वंदे भारत रेल्वे सेवा वाढविल्याने बेळगाव जिल्ह्याला याचा फायदा होणार आहे.
बेळगाव पर्यंत वंदे भारत रेल्वे सेवा विस्तारल्यास महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचाही संपर्क जुळला जाणार आहे. त्यामुळे वंदे भारत रेल्वे सेवा बेळगाव पर्यंत वाढवावी असे निवेदन मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना करण्यात आले आहे.