कसबा वाळवे, वार्ताहर
पालकरवाडी (ता.राधानगरी) येथील बाळासो नारायण भोईटे (वय- ४१) यांचा कालव्यामध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना सकाळी 11 च्या दरम्यान घडली. सकाळी पाणी आणण्यासाठी गेले असताना अचानक पाय घसरून कालव्यात पडले. पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. बाळासो भोईटे यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,
बाळासो भोईटे यांची शेती कालव्या शेजारी आहे. आज सकाळी पाणी आणण्यासाठी ते कालव्याजवळ गेले यावेळी त्यांचा पाय घसरल्याने ते कालव्यात पडले. भोईटे कालव्यात पडल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ कालव्याजवळ जमले. बाळासो यांना पाण्यातून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय सोळांकूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत करुन शवविच्छेदन केले. या घटनेची फिर्याद पोलीस पाटील शंकर पोतदार व सुभाष भोईटे यांनी राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये दिली. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल पी. डी. गुरव करत आहेत.
सुभाष भोईटे यांच्या पश्चात आई-वडील पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. बाळासो भोईटे यांच्या अपघाती निधनाने आई -वडील, पत्नी व मुलांनी फोडलेल्या हंबरड्याने सर्वांचे डोळे पाण्यावले.बाळाासो शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.