वार्ताहर /किणये
मंडोळी येथे सात एकर काजू बागेला आग लागून झाडे व काजू फळ जळून खाक झाले आहे. ही आग गेल्या दोन दिवसांपूर्वी लागली आहे. डोंगर भागातून वनवा पेटून आग लागली असावी, असा संशय शेतकऱयांतून व्यक्त होत आहे. मात्र काजू बागेला आग लागल्यामुळे इतर बागायतदार शेतकऱयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंडोळी गावच्या डोंगरपायथ्याशी लक्ष्मण भाऊ नावगेकर यांची काजू बाग आहे. त्यांच्या सात एकर काजू बागेला आग लागून झाडांना लागलेली काजूची फळधारणा व झाडे जळाली आहेत. यामुळे त्यांचे सुमारे चार लाखाचे नुकसान झाले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.