शिराळा : वार्ताहर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी महिन्याच्या पहिल्या शनिवारी एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम राबवावा.असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा तथा पालक मंत्री जयंतराव पाटील यांनी केले. शिराळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित परिसंवाद मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी आमदार मानसिंगराव नाईक माजी मंत्री शिवाजीराव नाईक आमदार अरुण लाड, युवक जिल्हाध्यक्ष विराज नाईक रणधीर नाईक, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, सुस्मिता जाधव, प्रतिक पाटील, रविंद्र बर्डे, देवराज,पाटील, सुखदेव पाटील, चिमण डांगे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले की, आपण राज्यातील पक्षाचे कार्यकर्ते शहरात राहून गावचे राजकारण करत असतो. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी महिन्याच्या पहिल्या शनिवारी एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम राबवावा.यामुळे संवादाने पक्ष वाढेल. नवीन पिढीतील युवकांचे वेगेवगळे विचार समोर येतील.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलच्या कार्यकर्त्यांनी पक्षावाढीसाठी कामं करावे. अडीच वर्षांत बुथ कमिट्या करण्यावर भर दिला आहे.बुथ कमिट्या सक्षम करण्याची गरज आहे.
तसेच चांदोली पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील असून चांदोली पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील असून धरणाच्या पायथ्याशी मगर पार्क व बिबट्याच्या उद्यानात खाद्य तयार करण्यासाठी सागरेश्वर येथील प्राणी सोडण्यात येतील. त्यांची पैदास होण्यासठी त्यासाठी प्रजनन केंद्र सुरु करणार आहे. त्यामुळे बिबट्याला खाद्य उपलब्ध होण्यास मदत होईल.
आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, या मतदार संघातील पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीचे पाणी, अंतर्गत रस्ते, पुल उभारणी आदी सर्व कामांना प्राधान्य देऊन चालना देण्याचे काम केले केले. या संवाद मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार एकत्रित आणण्याचं काम जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांनी केले आहे. तर २३ एप्रिलला कोल्हापूर येथे होणाऱ्या संवाद यात्रेच्या सांगता समारंभास शिराळा मतदार संघातून सात हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते जाणार आहेत.
माजी आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, युवक व कार्यकर्त्यांना उर्जा देण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. या संवाद यात्रेच्या निमित्ताने युवा पिढीत नवचैतन्य वातावरण पसरले आहे. तर २०२४ च्या निवडणुकीत दोनशे पेक्षा जास्त जगावर विजय मिळवायचा असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्ती जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासून कामास लागावे. तसेच आगामी जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपंचायत , नगरपरिषद या स्थानिक संस्थावर एक हाती सत्ता आणायची आहे.
यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र वरपे , विध्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुरेश गवाने ,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष साधना पाटील, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षना सलगर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे यांनी केले. तर आभार बी.के. नायकवडी यांनी मानले.
कार्यक्रमास सुरेश चव्हाण, अमरसिंह नाईक, राजेंद्र नाईक, माजी उपनगराध्यक्ष किर्ती कुमार पाटील, सम्राटसिंह नाईक ,महादेव कदम, नगराध्यक्षा प्रतिभा पवार, अश्विनी नाईक, संचालक विश्वास कदम, माजी नगराध्यक्ष सुनंदा सोनटक्के सुनिता निकम, डॉ शैलेश माने, अविनाश पाटील, विजय पाटील, प्रमोद नाईक, बाळासाहेब पाटील आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.