सावंतवाडी / प्रतिनिधी
सावंतवाडी शहरांमध्ये गेले काही दिवस सर्व मुख्य रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता या रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्रस्त झालेली आहे. शहरातील काही रस्त्यांकरिता निधी मंजूर झालेला आहे परंतु अद्यापही रस्त्यांचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे सर्व सामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.शहरातील मुख्य रस्ता, खासकीलवाडा, सालईवाडा, कॉलेज, प्रांत कचेरी,भडवाडी रोड, उभा बाजार, मशीद रोड ते माठेवाडा रोड या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. अर्बन बँक, न्यू सालेई वाडा रोड तसेच शहरातील काही भागातील नळ कनेक्शन दिलेले आहे त्या ठिकाणी देखील खड्डे व्यवस्थित बुजवले गेले नाहीत. तरी पावसामुळे पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व खेळ असते खड्डे मुक्त करून व जनतेला त्वरीत दिलासा द्यावा. असे निवेदन संजू शिरोडकर यांनी सावंतवाडी नगरपालिका मुख्याधिकारी यांना दिलंय .
त्याचप्रमाणे शहरातील प्रचंड प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झालेला असून अद्याप पर्यंत फवारणी केलेली नसल्यामुळे शहरातील नागरिक डासांनी जास्त झालेले आहेत, डासांची फवारणी लवकर लवकर करावी. शहरातील मोकाट व भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चाललेला असून कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून देखील कुत्र्यांचा उपद्रव हा कमी झालेला दिसून येत नाही तरी याबाबत लवकरात लवकरच कारवाई करावी ज्याप्रमाणे पाणीपट्टी,घरपट्टी वसुली करता मुख्याधिकारी यांनी गाडीला बॅनर लावून वसुली करण्यात तत्परता दाखवली आहे त्याचप्रमाणे वरील मुद्द्यां नुसार त्याचे निरसन दाखवण्याकरता दाखवावी आणि जनतेच्या जनतेचा उद्रेक होऊन त्याचे तीव्र पडसाद उमटण्यास त्याची जबाबदारी प्रशासनांची राहील.असे निवेदनात म्हटले आहे .