पावसामुळे शेकडो एकर जमीन पाण्याखाली : चर मारून पाईप घालण्याची शेतकऱयांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
हलगा-मच्छे बायपास हा रस्ता शेतकऱयांना दिवसेंदिवस डोकेदुखीचा ठरू लागला आहे. कोणतेही नियोजन नाही, न्यायालयाकडून रितसर परवानगी नाही, मात्र या रस्त्याचे काम दडपशाहीने करण्यात येत आहे. आता मच्छेकडून येळ्ळूर रस्त्यापर्यंत माती टाकून रस्त्याचे सपाटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता उंच झाला आहे. परिणामी पावसाचे पाणी उत्तरेकडच्या बाजूला जाणे अशक्मय झाल्याने पहिल्याच पावसात शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
हलगा-मच्छे बायपास रस्त्याला तातडीने चर मारून मोठे पाईप घालावेत, अशी मागणी सध्या शेतकरी करत आहेत. पाईप घातले नाहीत तर यावषी येळ्ळूर, शहापूर, अनगोळ, धामणे, वडगावसह परिसरातील शिवाराला मोठा फटका बसणार आहे. एक तर बळ्ळारी नाला गाळाने तुडुंब भरला आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होणे अशक्मय झाले आहे. यातच हलगा-मच्छे बायपासचे काम घिसाडघाईने सुरू करण्यात आले आहे.
नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्त्याच्या दक्षिणेकडच्या बाजूला असलेल्या शिवारात पाणी साचून आहे. आता भातपेरणीला सुरुवात होणार आहे. मात्र, पाणी साचल्यामुळे शेतकऱयांना भातपेरणी करणे अशक्मय झाले आहे. सध्या पाणी तुंबून असल्यामुळे भातपेरणी करायची कशी? असा प्रश्न पडला आहे. तेव्हा तातडीने या रस्त्याला चर मारून किमान चार ते पाच ठिकाणी मोठे पाईप घालावेत. याचबरोबर रस्त्याला लागून दोन्ही बाजूला मोठी चर मारावी, अन्यथा दक्षिणेकडील पिके कुजण्याची भीती व्यक्त होत आहे.
साऱयांचीच द्विधा मनःस्थिती
हलगा-मच्छे बायपास हा रस्ता अत्यंत सुपीक जमिनीतून होत आहे. शेतकऱयांनी त्याला वारंवार विरोध केला आहे. याबाबत न्यायालयात खटलादेखील दाखल केला आहे. त्यामुळे काही दिवस काम सुरू ठेवायचे आणि काही दिवस काम बंद करायचे, असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे साऱयांचीच द्विधा मनःस्थिती झाली आहे. मात्र, यामुळे रस्त्यामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आता इतर शेतकऱयांनाही त्याचा मोठा फटका बसू लागला आहे.
येळ्ळूरपासून तसेच धामणे व इतर परिसरातून मोठय़ा प्रमाणात पाणी बळ्ळारी नाल्याला जाते. शिवारातून शेतकरी पाणी काढून कालव्याला जोडत होते. मात्र, आता रस्ता झाल्याने पाणी उत्तरेकडील बाजूला जाणे अशक्मय आहे. त्यामुळे येळ्ळूर, धामणे, वडगाव शिवारातील हजारो एकर जमीन पाण्याखाली जाणार आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास यंदा खरीप पेरणी करणेही कठीण आहे. तेव्हा कंत्राटदाराने तातडीने या ठिकाणी पाईप किंवा मोठी चर मारून पाण्याला वाट मोकळी करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
हलगा-मच्छे बायपासचे काम पुन्हा सुरू : आज शेतकरी घेणार जिल्हाधिकाऱयांची भेट
हलगा-मच्छे बायपास रस्त्यासाठी न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र, तरीदेखील काम सुरूच ठेवण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी प्रांताधिकाऱयांनी कंत्राटदाराला काम बंद ठेवण्याबाबत सूचना केली होती. याबाबतचे पत्र शेतकऱयांनाही पाठविण्यात आले होते. मात्र, सोमवारी पुन्हा हे काम सुरू ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारी शेतकरी जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकाऱयांची भेट घेणार आहेत.
हलगा-मच्छे बायपासचे काम वारंवार दडपशाही करत सुरू करण्यात येत आहे. न्यायालयामध्ये हा खटला प्रलंबित असताना हे काम केले जात आहे. त्यामुळे शेतकऱयांतून नाराजी व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी प्रांताधिकाऱयांनी कंत्राटदाराला काम बंद करण्याचे पत्र पाठविले होते. याची एक प्रत याचिकाकर्ते शेतकऱयांनादेखील पाठविली होती. मात्र, सोमवारी पुन्हा काम सुरू केले. त्यामुळे शेतकऱयांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.