ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असे मत अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी मांडले.
नागपुरात मंगळवारी अभिरुप न्यायालय पार पडले. त्यावेळी अमृता फडणवीस बोलत होत्या. त्या म्हणाल्या, मला राजकारण आवडत नाही. मला त्यात रसही नाही. जे 24 तास राजकारणासाठी देतात आणि राजकारणात जे लायक आहेत त्यांना मुख्यमंत्री केले पाहिजे. देवेंद्रजी 24 तास समाजासाठी झटत असतात. मी राजकारणासाठी पूर्ण वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे मला यात पडायचे नाही. आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत.
अधिक वाचा : अपंग लोकांसाठी भारतातील व्यवस्था किती खराब आहे…
मी राजकीय गोष्टींवर खूप कमी मत व्यक्त करते. ते माझ्यासाठी आणि देवेंद्रजींसाठी फायदेशीर आहे. कारण अनेकांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून याचा फायदा घेतला आहे. सामान्य लोक माझ्यावर टीका करत नाहीत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या लोकांना मी फारसे महत्त्व देत नाही. मी फक्त माझ्या आईला आणि सासूबाईंना घाबरते. मी जास्त बोलते म्हणून माझी यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे तक्रारही करण्यात आली होती. मी खूप बोलते हे जरी खरे असले तरीही मी कोणतीही प्रतिमा तयार करण्यासाठी बोलत नाही, असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.